HW News Marathi
देश / विदेश

भारत अहिंसेच्या मार्गाने चालणारा देश, भागवतांनी केले गांधीजींच्या कार्याचे कौतुक

नागपूर | दस-याचे औचित्यसाधून स्वसंसेवकसंघाच्या व्यासपीठावरुन सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून महात्मा गांधीजींच्या कार्याचे प्रचंड कौतुक केले.सत्य आणि अहिंसेच्या जोरावर राजकारण केले जाऊ शकते, याची कल्पना फक्त आपल्याच देशातील व्यक्ती करू शकते. महात्मा गांधी यांनी ते करुन दाखवले आहे, अशा शब्दांमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी महात्मा गांधी यांचं कौतुक केले आहे.

इंग्रजांचा सामना महात्मा गांधीजींनी निशस्त्रपणे केला. केवळ नैतिक बळाच्या आधारावर त्यांनी इंग्रजांशी दोन हात केले, असेही भागवत यावेळी बोलताना म्हणाले. संघ मुख्यालयात आज विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालकांनी महात्मा गांधींच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. या कार्यक्रमाला नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दहशतवादाविरोधी लढाईत अमेरिका भारतासोबत

News Desk

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिला राजीनामा!

News Desk

सुपरस्टार रजनीकांत यांचा राजकारणात येण्याचा निर्णय मागे 

News Desk
मनोरंजन

ज्येष्ठ साहित्यिक केशव पुरोहित यांचे निधन

News Desk

मुंबई | ज्येष्ठ साहित्यिक केशव जगन्नाथ पुरोहित उर्फ शांताराम यांचे वृद्धपकाळाने बुधवारी वांद्रे येथील साहित्य सहवासातील निवासस्थानी निधन झाले. वयाच्या ९५ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. पुरोहित यांच्या पार्थिवावर रात्री १० वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

के.ज.पुरोहित हे ‘शांताराम’ नावाने लेखन करीत. त्यांचा जन्म नागपूरचा. नागपूर विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी अमरावती, नागपूर, मुंबईमधील विविध महाविद्यालयांमध्ये ४० वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. जोगेश्वरीच्या इस्माइल युसुफ महाविद्यालयात त्यांनी प्राचार्य म्हणून काम पाहिले. पुरोहित यांचे पूर्ण नाव केशव जगन्नाथ पुरोहित पण त्यांनी ‘शांताराम’ या टोपणनावाने लेखन केले. १९८९ साली अमरावती येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.

Related posts

दीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी…!

Gauri Tilekar

आज चंद्र पूर्ण लाल दिसणार; 152 वर्षांनंतर दुर्मिळ योग

Adil

मोडी लिपीतून दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या पणत्या

swarit