HW News Marathi
राजकारण

#Results2018 : तेलंगणामध्ये टीआरएसने राखली सत्ता

नवी दिल्ली | तेलंगणात चंद्रशेखर राव यांना सत्ता राखण्यात यश मिळाले आहे. चंद्रशेखर राव यांच्या टीआरएस पक्षाला लोकांनी कौल दिला असल्याचे दिसत आहे. विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये टीआरएसला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरल्याचे दिसत आहे. विधानसभेतील ९० जागांवर टीआरएसला आघाडी मिळाली आहे. तेलंगणाच्या निर्मितीत चंद्रशेखर राव यांचा सिंहाचा वाटा आहे.

राज्यातील राजकारणावर चंद्रशेखर राव यांची पकड मजबूत आहे. त्यामुळे ते सत्ता काबीज करतील, असे अंदाज सर्वांकडूनच व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगणामध्ये बहुमताचा आकडा ६० आहे. हा आकडा गाठण्यासाठी टीआरएसला यश मिळाल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसला १९ आणि भाजपला केवळ ३ जागांवर आघाडी मिळाली आहे. तेलंगणातील ११९ जागांसाठी सर्वच पक्षांच्या मिळून १८२१ उमेदवारांचे राजकीय भविष्य मतदान यंत्रात कैद झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्य सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा अंहकार

swarit

गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यलयाजवळ बॉम्ब असल्याचा निनावी फोन

News Desk

पालघरमध्ये पैशांचा बाजार

News Desk
देश / विदेश

#Results2018 : तेलंगणामध्ये एआयएमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयी

News Desk

नवी दिल्ली | एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी हे तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चंद्रायन गुट्टा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. अकबरुद्दीन यांनी हा विजय मिळवत तब्बल पाचव्यांदा आपले आमदार पद कायम राखले आहे. या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत टोकाच्या भाषेत टीका केली होती.

“चहावाल्या, आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करू नका. चहा-चहा ओरडता, लक्षात ठेवा एवढं बोलेन की तुमच्या कानातून रक्त येईल”, असे अत्यंत टोकाचे आणि वादग्रस्त विधान अकबरुद्दीन ओवेसी यांनी तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचारात पंतप्रधान मोदींबाबत केले होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर देखील अकबरुद्दीन ओवेसी यांनी टीका केली होती. “आज आणखी एक जण आला आहे. तो असे कपडे घालतो कि एखाद्या तमाशासारखा दिसतो. नशिबानं मुख्यमंत्री झाला आहे. तो म्हणतो, निजामाप्रमाणे ओवेसीला पळवेन. अरे तुझी लायकी काय आहे ? अरे ओवेसीला सोड, त्याच्या पुढे येणाऱ्या १०० जातीदेखील या देशात राहतील आणि तुमच्या विरोधात लढतील”, अशा शब्दात त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर देखील टीका केली आहे.

Related posts

तुम्हाला हव्या त्या वस्तू खरेदी करा, निघून जा !

News Desk

‘मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले’, सचिन सावंतांची संतप्त प्रतिक्रिया

News Desk

उत्तर कोरियाच्या हल्ल्याला प्रत्त्यूतर देण्यास सज्ज- अमेरिका

News Desk