HW News Marathi
Covid-19

कोरोनाचा उद्रेक! भारत-नेपाळ सीमेवरील २२ ठिकाणी एन्ट्री पॉईंट बंद

काठमांडू | भारतात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शेजारचे देशही आता सतर्क झाले आहेत. भारताच्या शेजारील देश म्हणजेच नेपाळनेदेखील २२ ठिकाणी प्रवेश बंदी लागू केली आहे. भारतातून नेपाळमध्ये जाण्यासाठी ३५ ठिकाणी एन्ट्री पॉईंट आहेत. त्यापैकी २२ एन्ट्री पॉईंट बंद केले असल्याचे नेपाळच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आता नेपाळ आणि भारतात आता फक्त १३ ठिकाणच्या एन्ट्री पॉईंटवरून दळणवळण सुरू राहणार आहे. भारतात करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात हा निर्णय घेण्यात आला आहे. नेपाळच्या कोविड संकट व्यवस्थापन समन्वय समितीने एन्ट्री पॉईंट बंद करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

भारतात करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे इतर देशही सतर्क झाले आहेत. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन , संयुक्त अरब अमिरात आदी देशांनी भारतीयांना प्रवेश बंदी केली आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना तातडीने भारत सोडण्याची सूचना केली आहे.

भारतात गेल्या २४ तासांत ३,९२,४८८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३६८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. ४ लाख ०१ हजार ९९३ करोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर याच २४ तासांत ३५२३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल २ लाख ९९ हजार ९८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ९१ लाखांहून अधिक झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केडीएमसी शहरात वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्थलांतरित मजुरांच्या रांगा

News Desk

मजूरांच्या खर्चाबद्दल केंद्र खोटं बोलतयं – अनिल देशमुख

News Desk

देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे !

News Desk