HW News Marathi
देश / विदेश

भारत-पाक सीमेवर २,०६१ पैकी केवळ ६६१ फेन्सिंग लाईट पोल्सच चालू

नवी दिल्ली | भारत-पाकिस्तानसारख्या अत्यंत संवेदनशील सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेशी खेळ सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. गुजरातमधील भूज आणि गांधीनगर सेक्टरमधील भारत- पाकिस्तानच्या सीमेच्या कुंपणावरील २,०६१ फेन्सिंग लाईट पोल्सपैकी केवळ ६६१ पोल्सच चालू आहेत. तर डिझेलवर चालणाऱ्या ८२ पैकी केवळ ३८ जनरेटर्स सुरु असल्याची धक्कादायक माहिती सीमा सुरक्षा दलाने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्याचप्रामणे हे ६६१ पोल्स सोडून अन्य सर्व फेन्सिंग लाईट पोल्स हे विजेअभावी पूर्णपणे बंद आहेत.

भारत-पाकिस्तानसारख्या इतक्या संवेदनशील सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेत होणार अशा प्रकारचा निष्काळजीपणा ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सीमा सुरक्षा दलाने म्हटले आहे. बीएसएफ मुख्यालयात झालेल्या बैठकीत देशाच्या सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत दाखविलेला निष्काळजीपणा उघड झाला आहे.

सीमेवर नादुरुस्‍त फेन्सिंग लाईट पोल्समुळे सुरक्षा दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बीएसएफने म्हटले आहे. या फेन्सिंग लाईट पोल्सच्या दुरूस्‍तीचे काम सुरू करण्यात आले असून लवकर ते पूर्ण करण्यात येईल असे केंद्रीय बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वडेट्टीवार खाजगीत मराठा समाजाला ओबीसीत घेण्याचा सल्ला देतात अन् ! संभाजीराजेंची टीका

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली सीडीएस बिपीन रावत यांना श्रद्धांजली

News Desk

डोनाल्ड ट्रम्प यांचे पत्रकारांशी पुन्हा वाद

Gauri Tilekar
राजकारण

मोदी हत्येचा कट रचणा-यांचा निषेध | आठवले

News Desk

मुंबई | दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडा प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा धक्कादायक ई मेल पोलीस यंत्रणेला मिळाला आहे. याबाबतचे वृत्त कळताच असे षडयंत्र रचणाऱ्या हिंसक देशविघातक प्रवृत्तीचा तीव्र धिक्कार निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार देशाचा कारभार करीत असून सबका साथ सबका विकास हे सूत्र घेऊन ते संविधानातील भारत साकार करत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही एका धर्माला ताकद देत असल्याचा आरोप चुकीचा असून त्यांच्याविरुद्ध आत्मघातकी हल्ला करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या देशविघातक शक्तींचा आपण तीव्र निषेध करीत आहोत. अश्या खुनी हल्ल्यांच्या धमक्यांना प्रधानमंत्री बळी पडणार नाहीत. आत्मघातकी हल्ल्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना संपविण्याचे कारस्थान रचणाऱ्या शक्तींना जनता माफ करणार नाही असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

पुणे सत्र न्यायालयात सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना राजीव गांधी हत्याकांडासारखे आत्मघातकी हल्ल्यात संपविण्याचा कट असल्याचा ईमेल पोलिसांना मिळाला आहे अशी धक्कादायक माहिती दिली. ही माहिती मिळताच रामदास आठवले यांनी असा कट रचणाऱ्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Related posts

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

“धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्याकडे निव्वळ विनोद म्हणून पाहते”- प्रीतम मुंडे

News Desk

तब्बल २३ तासांनी लागला निकाल, भाजपचे डावखरे विजयी

News Desk