HW News Marathi
देश / विदेश

भारत-पाक सीमेवर २,०६१ पैकी केवळ ६६१ फेन्सिंग लाईट पोल्सच चालू

नवी दिल्ली | भारत-पाकिस्तानसारख्या अत्यंत संवेदनशील सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेशी खेळ सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. गुजरातमधील भूज आणि गांधीनगर सेक्टरमधील भारत- पाकिस्तानच्या सीमेच्या कुंपणावरील २,०६१ फेन्सिंग लाईट पोल्सपैकी केवळ ६६१ पोल्सच चालू आहेत. तर डिझेलवर चालणाऱ्या ८२ पैकी केवळ ३८ जनरेटर्स सुरु असल्याची धक्कादायक माहिती सीमा सुरक्षा दलाने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्याचप्रामणे हे ६६१ पोल्स सोडून अन्य सर्व फेन्सिंग लाईट पोल्स हे विजेअभावी पूर्णपणे बंद आहेत.

भारत-पाकिस्तानसारख्या इतक्या संवेदनशील सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेत होणार अशा प्रकारचा निष्काळजीपणा ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सीमा सुरक्षा दलाने म्हटले आहे. बीएसएफ मुख्यालयात झालेल्या बैठकीत देशाच्या सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत दाखविलेला निष्काळजीपणा उघड झाला आहे.

सीमेवर नादुरुस्‍त फेन्सिंग लाईट पोल्समुळे सुरक्षा दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बीएसएफने म्हटले आहे. या फेन्सिंग लाईट पोल्सच्या दुरूस्‍तीचे काम सुरू करण्यात आले असून लवकर ते पूर्ण करण्यात येईल असे केंद्रीय बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना’बाधिताच्या संपर्कात आल्याने औरंगाबादमधील तब्बल २० जणांना क्वारंटाईन

News Desk

काश्मीरमध्ये ४ दहशतवाद्यांना कंठस्नान, १ जवान शहीद

News Desk

अमेरिकेने रोखली पाकिस्तानची रसद

News Desk
देश / विदेश

१५ हजार महिलांची सुरक्षित प्रसूती करणाऱ्या पद्मश्री सुलागिट्टी नरसम्मा यांचे निधन

News Desk

मुंबई | कर्नाटकमधील दुर्गम भागांमध्ये जाऊन महिलांची प्रसूती करणाऱ्या पद्मश्री विजेत्या सुलागिट्टी नरसम्मा (९८) यांचे निधन झाले आहे. सुलागिट्टी यांचे आज (२५ डिसेंबर) वृद्धापकाळाने निधन झाले. सुलागिट्टी या जननी अम्मा म्हणून त्यांना ओळखले जात होते. कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यात जन्माला आलेल्या नरसम्मा यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात १५ हजार महिलांची सुरक्षित प्रसूती केली होती. येथील दुर्गम भागात पाऊस, हिंस्त्र श्वापद यांची परवा न करता.

नरसम्मा गरोदर महिलेची सुखरूप सुटका करण्यासाठी जायच्या. त्यामुळे येथील आदिवासी त्यांना जननी अम्मा म्हणून संबोधित केले आहे. सामाजिक क्षेत्रात अतुलनिय योगदान दिल्याबद्दल त्यांना सरकारने पद्मश्री सन्मान देऊन गौरवले होते. कुठल्याही वैद्यकिय मदतीशिवाय त्या महिलेची प्रसूती करायच्या. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. तुमकुर विश्वविद्यालयाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.

Related posts

गिरीश कर्नाड यांच्या निधनानिमित्ताने कर्नाटक सरकारकडून ३ दिवसांचा दुखवटा जाहीर

News Desk

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

Gauri Tilekar

दिल्लीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

News Desk