HW News Marathi
देश / विदेश

आर्टीफिशिअल इंटेलिजन्समध्ये भारताने भरीव कामगिरी करावी – पंतप्रधान

नवी दिल्ली | आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या विषयावर पहिली जागतिक परिषद भारत सरकारने आयोजित केली आहे. त्याचे उद्घाटन काल (५ ऑक्टोबर) पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. Responsible AI for Social Empowerment 2020 किंवा RAISE 2020 या नावाची ही शिखर परिषद कालपासून (५ ऑक्टोबर) पाच दिवस चालणार आहे. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या परिषदेत पंतप्रधान मोदींनी भारत AI साठी ग्लोबल हब बनावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

या परिषदेत नीती आयोगाचे प्रमुख अमिताभ कांत, रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी, IBM चे सीईओ अरविंद कृष्णा हेसुद्धा सहभागी झाले होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नीती आयोग मिळून या शिखर परिषदेचं आयोजन केलं. भारताने AI च्या क्षेत्रात भरीव कामगिरी करावी आणि आपला देश कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक केंद्र ठरावाअशी इच्छा पंतप्रधान मोदींनी या वेळी व्यक्त केली आहे.

“सध्या भारताकडे उपलब्ध असलेली संसाधनं आणि संधी पाहता जगात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी आणि वर्ल्ड लीडर बनण्यासाठी ही सुयोग्य वेळ आहे. AI ला चालना देण्यासाठी आणि नवा मजबूत भारत बनवण्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी या देशाची युवा पिढी, इंडस्ट्री आणि अवघा देश तयार आहे”, असेही अंबानी यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकणात मदतीसाठी ‘नेव्ही रेस्क्यू फोर्सची’ आवश्यकता, सुप्रिया सुळेंची संरक्षण मंत्र्यांकडे मागणी

News Desk

छोटा राजनसह चौघांना सात वर्षांचा कारावास

News Desk

298 भारतीय झाले पाकिस्तानी!

News Desk