HW News Marathi
देश / विदेश

भारत दहशतवादाने त्रस्त, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल प्रसिद्ध

नवी दिल्ली | अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार दहशतवादाचा फटका बसणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेकडून प्रत्येक वर्षी दहशतवादाचा फटका बसणाऱ्या देशांची यादी ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम’ या अहवालात प्रसिद्ध करण्यात येते. यावर्षीच्या यादीत इराक पहिल्या, अफगाणिस्तान दुसऱ्या, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या यादीत गेल्या दोन वर्षांपासून भारत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे धोकादायक दहशतवादी संघटनांचीही यादी तयार करण्यात आली आहे. जगातील दहशतवादी संघटनांचा विचार केल्यास इसिस, तालिबान, अल-शबाब यांच्यानंतर सीपीआय-माओवादी संघटना चौथ्या स्थानी आहेत. भारतात झालेल्या ५३ टक्के हल्ल्यांमध्ये याच संघटनेचा हात असल्याची माहिती अमेरिकेने दिली आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांचादेखील समावेश आहे. २०१७ साली जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या दहशतवादी मधील मृत व्यक्तींचे प्रमाण तब्बल ८९ टक्क्यांनी वाढले आहे, अशी आकडेवारी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. २०१७ साली भारतात झालेल्या एकूण ८६० दहशतवादी हल्ल्यांपैकी २५ टक्के हल्ले फक्त जम्मू-काश्मीरमध्ये झाले आहेत, अशी आकडेवारी अमेरिकेन सरकारच्या अहवालात प्रसिद्ध केली गेली आहे.

भारतात २०१६ आणि २०१७ या वर्षात माओवाद्यांचे हल्ले कमी झालेले असले तरी या हल्ल्यांतील मृतांची संख्या १६ टक्क्यांनी वाढली आहे. एवढेच नव्हे तर जखमींच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी आकडेवारी अहवालात प्रसिद्ध केली गेली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रमोद सावंत दुसऱ्यांदा होणार गोव्याचे मुख्यमंत्री, नावावर शिक्कामोर्तब

Aprna

केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन काल घसरले, १८ जणांचा मृत्यू तर विमानाचे झाले २ तुकडे 

News Desk

यंदाच्या स्वातंत्र दिनी या राजकीय नेत्यांनी केले ध्वजारोहण

swarit