HW News Marathi
देश / विदेश

 मुंबई विमातळावर भारतीय हवाई दलाचे मालवाहक विमान धावपट्टीवरून घसरले

मुंबई | मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्‍ट्रीय विमातळावर भारतीय हवाई दलाचे एएन-३२ हे मालवाहक विमान धावपट्टीवरुन घसरले. यामुळे विमानतळ काही तासांसाठी बंद ठेवण्यात आल्याने हजारो प्रवशांचे हाल झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या घटनेनंतर ५० विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.

हवाई दलाचे एएन-३२ विमान धावपट्टी क्रमांक-२७ वर ओव्हररन झाल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, काल (७ मे) रात्री ११ वाजून ३९ मिनिटांनी भारतीय हवाई दलाचे एएन-३२ हे मालवाहू विमान धावपट्टीवरुन घसरले. हे विमान बेंगळूरु नजीकच्या येलहांका या भारतीय हवाई दलाच्या तळाकडे जात असताना धावपट्टीवरून घसरले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्रिटनच्या राजपुत्र प्रिन्स हॅरीचा शाही विवाह सोहळा

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !

News Desk

#COVID19 : मुंबईत ८१ रुग्णांची नोंद, तर राज्यात कोरोना बाधितांची संख्या ७४८वर

News Desk