HW News Marathi
देश / विदेश

भारतीय लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आऊट मोहीम अधिक तीव्र झाल्याचे पहायला मिळत आहे. लष्कराने शुक्रवारी सकाळी आणखी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्या वृत्त समोर आले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील स्रीगुफवारा भागात सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले असून, या चकमकीत एक पोलीस कर्मचारी देखील शहीद झाला असून दोन नागरिक जखमी झाल्याती माहिती समोर आली आहे.

जम्मू काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद्य यांनी यांनी या संदर्भात बोलताना सांगितले आहे की, या परिसरात तीन ते चार दहशतवादी लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर पहाटेपासून या चकमकीला सुरुवात झाली त्यामध्ये आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर एका पोलीस कर्मचाऱ्याला वीरमरण आले आहे. तसेच दोन नागरिक जखमी झाले आहेत.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात व्याघ्रगणना सुरू असतानाच ३ वाघांचा बळी

Gauri Tilekar

राहुल गाधींच्या वक्तव्याने मोदी झाले अवाक

News Desk

#AyodhyaRamMandir : जाणून घ्या…१०६ वर्ष जुन्या अयोध्या प्रकरणाचा रंजक घटनाक्रम

News Desk