HW News Marathi
देश / विदेश

भारतीय लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आऊट मोहीम अधिक तीव्र झाल्याचे पहायला मिळत आहे. लष्कराने शुक्रवारी सकाळी आणखी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्या वृत्त समोर आले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील स्रीगुफवारा भागात सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले असून, या चकमकीत एक पोलीस कर्मचारी देखील शहीद झाला असून दोन नागरिक जखमी झाल्याती माहिती समोर आली आहे.

जम्मू काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद्य यांनी यांनी या संदर्भात बोलताना सांगितले आहे की, या परिसरात तीन ते चार दहशतवादी लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर पहाटेपासून या चकमकीला सुरुवात झाली त्यामध्ये आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर एका पोलीस कर्मचाऱ्याला वीरमरण आले आहे. तसेच दोन नागरिक जखमी झाले आहेत.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द ! मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाला वर्ष पूर्ण

News Desk

नीरव मोदीला लवकरच अटक होण्याची शक्यता

swarit

‘नजरचुकीने’ केलेली व्याजदर कपातीची ‘चूक’ सुधारली पण इंधन दरवाढीची ‘घोडचूक’ कधी सुधारणार?

News Desk
मुंबई

एसी लोकलच्या भाडेवाढीला पुढील सहा महिन्यासाठी स्थगिती

News Desk

मुंबई | पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या प्रवाशांना खुशखबर दिली आहे. २५ जूनपासून एसी लोकचे भाड्यात वाढ होणार होती. परंतु एसी लोकलच्या भाडेवाढीला पश्चिम रेल्वेने स्थगिती दिली आहे. यामुळे डिसेंबरपर्यंत एसी लोकलच्या भाडेत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात येणार नाही. देशातील पहिली एसी लोकल गेल्या वर्षी नाताळाच्या मुहूर्तावर बोरिवली ते चर्चगेट दरम्यान सुरू करण्यात आली होती. प्रवाशांच्या पसंतीनंतर एसी लोकलचा विस्तार विरारपर्यंत करण्यात आला.

एसी लोकलचे सुरुवातील जीएसटीसह तिकीटच्या किमतीत ६० रुपये असून कमाल भाडे २०५ रुपये असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. एसी लोकल सुरु झाल्यानंतर त्यांचे तिकीट दर जास्त असल्यामुळे प्रवाशांनी लोकलकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे एसी लोकल तोट्यात जात होती. एसी लोकल प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी डिस्काउंड देण्यात आला. त्यानंतर एसी लोकलच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली होती. प्रवाशांच्या वाढत्या संख्या पाहता भाडेवाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली आहे.

Related posts

इंदिरा गांधीवरील ठरावावरून दोन्ही कॉँग्रेस आमने-समाने

News Desk

वंदे भारत एक्सप्रेसमुळे धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aprna

पोलिस अधिका-याची दादागिरी सीसीटिव्हीत कैद

News Desk