HW News Marathi
देश / विदेश

भारतीय सैन्य-दहशतवाद्यांमधील चकमकीत ६ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील त्राल येथे भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने ६ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. परंतु, हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे होते हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. या चकमकीनंतर परिसरातून दारूगोळ्याचा साठा देखील जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमधील ही चकमक अद्यापही सुरु आहे. त्राल येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली.

त्राल येथे झालेल्या या चकमकीत भारतीय सैन्याकडून खात्मा करण्यात आलेल्या ६ दहशतवाद्यांमध्ये झाकिर मुसाचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या दहशतवाद्याला देखील ठार केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी (२१ डिसेंबर) कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला होता. पाकिस्तान सैन्याने केलेल्या या गोळीबारात भारतीय सैन्याच्या २ अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अर्थव्यवस्थेची स्थिती आणि बेरोजगारी, सुप्रिया सुळेंनी मांडले अधिवेशनात महत्वाचे मुद्दे 

News Desk

#Budget2020 : यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांना मिळाला दिलासा

News Desk

उत्तर कोरिया पुन्हा ‘धमाका’ करण्याच्या तयारी

News Desk
राजकारण

राजीव गांधी यांच्या भारतरत्नवरुन आप’मध्ये वाद

News Desk

नवी दिल्ली | दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचा भारतरत्न काढून घेण्याचा प्रस्ताव दिल्ली विधानसभेत आप सरकारने मंजूर केला आहे. या वादादरम्यान आप नेत्या अलका लांबा यांची गच्छंती करण्यात आली आहे. लांबा यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला आहे. त्यांचे पक्षातील सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. अलका लांबा यांनी संबंधित प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. यामुळे लांबा यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सोमनाथ भारती यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. सोमनाथ भारती यांना पार्टीच्या प्रवक्तेपदावर हटवण्यात आले आहे. संबंधित प्रस्ताव आपणच दिल्याचा दावा सोमनाथ भारती यांनी केला आहे. या प्रस्तावामध्ये राजीव गांधी यांचा भारतरत्न काढून घेण्याची मागणी करण्यात आली होती.

 

 

Related posts

चेंबूरमधील मैदानाला दिवंगत बाबुराव शेजवळ यांचे नाव देऊन स्मृती जोपासणार | आठवले

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर त्यांच्या अपयशाची कबुली दिली | अब्दुल्ला

News Desk

विरोधकांच्या ईव्हीएम संशय प्रकरणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk