HW News Marathi
Covid-19

लडाखमध्ये तणाव, चीनने भारतीय सैन्यांना घेतले होते ताब्यात

नवी दिल्ली | जगभरात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असताना दुसरीकडे भारताच्या सीमेवर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. लढाखमध्ये निर्माण झालेली परिस्थती देशाच्या चिंतेत भर टाकणारी ठरली आहे. भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेल्या तणावामुळे आता भारताची चिंता वाढली आहे. चीनने चक्क नियंत्रण रेषेजवळ गस्त घालणाऱ्या भारतीय लष्कर आणि इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या पथकाला ताब्यात घेतले. त्यानंतर, चीनकडून भारतीय जवानांची सुटका देखील करण्यात आली. एनडीटीव्हीने सूत्रांच्या माहितीनुसार हे वृत्त समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चीनच्या या कृतीमुळे भारताची चिंता निश्चितच वाढली आहे.

लढाखमधील पँगगाँग तलावाजवळ हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती आहे. या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती पंतप्रधान कार्यालयाला देखील देण्यात आली आहे. दरम्यान चीनकडून भारतीय जवानांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर मोठया प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. परंतु, त्यानंतर दोन्ही देशांच्या कमांडर्समध्ये या पार्श्वभूमीवर एक बैठक झाली. या बैठकीनंतर परिस्थिती निवळल्याची माहिती मिळत आहे. काहीच दिवसांपूर्वी लडाखमध्ये दोन्ही देशांच्या जवानांमध्ये धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर चीनने ही कृती केल्याचे म्हटले जात आहे. या धक्काबुक्कीदरम्यान जवानांची शस्त्र देखील काढून घेण्यात आली होती. मात्र, त्यांची सुटका करण्यात आल्यानंतर ती शस्त्रे देखील परत करण्यात आल्याची माहिती या सूत्रांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना झाला कोरोना !

Arati More

पुणेकरांना दिलासा | पुण्यात सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार, महापौरांची घोषणा

News Desk

इंदोरीकर महाराजांचा निलेश लंकेंना पाठिंबा, ऑडियो क्लिप व्हायरल

News Desk