HW News Marathi
देश / विदेश

अखेर पाकिस्तानच्या कैदेतून हमीद अन्सारीची सुटका

नवी दिल्ली | पाकिस्तानच्या कैदेतून हमीद निहाल अन्सारी (३३) तब्बल ६ वर्षानंतर भारतात परतला. हमीदला आज (१८ डिसेंबर) पाकिस्तानमधून सोडण्यात आल्यानंतर अटारी- वाघा सीमेवर पाकिस्तानी लष्कराने त्याला भारतीय लष्कराकडे सोपविले. हमीदने अमृतसरमधील वाघा सीमेवर आपल्या परिवाराची भेट घेतली. यावेळी वाघा सीमेवर वातावरण भावनिक झाले होते.

मुंबईच्या हमीदची ऑनलाईनच्या माध्यमातून एका पाकिस्तानी मुलीबरोबर मैत्री झाली होती. त्या मुलीला भेटण्यासाठी हमीदने अफगानिस्तानमधून पाकिस्तानमध्ये अवैध रित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रकरणी २०१२ला मध्ये पाकिस्तानी लष्कराने हमीदला अटक केले होते. त्यानंतर हमीदवर पाकिस्तानात हेरगिरी करण्याच्या बाबतीत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

याप्रकरणी पाकिस्ताने हमीदला ६ वर्षाची शिक्षा झाली होती. त्या शिक्षेची मुदत १५ डिसेंबर रोजी संपली होती. त्यावेळी हमीदला सोडण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करणारी कागदपत्रे पूर्ण नसल्याने सोडण्यात आले नव्हते. परंतु गुरूवारी(१३ डिसेंबर) पाकिस्तान सरकारला पेशावर उच्च न्यायालयाने हमीदचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी एक महिन्याचा अवधी दिला होती. न्यायालयाच्या आदेशानुसार हमीदला भारतात पाठविण्यात अाले अाहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेना आणि माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडें आमने-सामने

News Desk

कांदा निर्यातबंदी हटवा, केंद्र सरकारला फलोत्पादन मंत्र्यांचे पत्र!

News Desk

पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक, जपानला दिला धक्का

News Desk
मनोरंजन

FLASHBACK 2018 : भारतीय अंध क्रिकेट संघ जगात सरर्वोत्तम

News Desk

वर्षाची सुरुवात झाली ती यंदा एका अतिशय आनंददायी घटनेने. भारतीय क्रीकेट जगतासाठी ही अतिशय उत्साहपुर्ण अशी घटना होती. भारताच्या अंध क्रिकेट संघाने ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कप आपल्या नावे केला. विषेश म्हणजे भारतीय संघाने या वर्ल्ड कपमध्ये आपला कायमच प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला २ विकेट ने हरवून विश्वकप आपल्या नावे केला. अभिमानाची बाब म्हणजे भारतीय अंध क्रिकेट संघाने हा विश्वकप दुसऱ्यांदा आपल्या नावे केला आहे.

पहीली खेळी पाकिस्तानने करत भारतीय संघापुढे ८ गडी गमावून ३०७ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दमदार खेळी करत ३८.४ ओवर मध्येच दोन गडी राखुन पाकीस्तानवर दमदार विजय मिळवला.

असा होता भारत पाकीस्तानचा हा सामना

पाकीस्तानने पहीली खेळी करत ३०७ धावांचे आव्हान भारतीय संघापुढे ठेवले होते. पाकीस्तानने ८ गडी गमावून हे आव्हान उभे केले होते. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा कर्णधार अजय रेड्डी याने ६० चेंडूत ६२ धावा केल्या तर खेळाडू रमेश याने ६७ चेंडूत ९३ धावा केल्या. प्रकाश आणि व्यंकटेश यांनी खेळाची दमदार सुरुवात केली. या दोघांनीही प्रति ओवर १० धावांच्या गतीने स्कोर बनवत भारतीय संघाला विजयाचा मुकूट घालण्यास मोलाची भर घातली.

व्यंकटेशने ३२ चेंडूत ३५ धावा केल्या तर प्रकाश ने ४२ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. २०१४ मध्ये सुध्दा याच भारतीय संघाने दक्षिण अफ्रीकेच्या केप टाउन मध्ये पाकीस्तानलाच हरवून विश्वकप जिंकला होता. काही दिवसांपुर्वी इंग्लडच्या क्रिकेट संघाचा कर्णधार एड हॉसेल यांने भारतीय अंध क्रिकेट संघ हा जगातला सर्वोत्तम संघ असल्याचे म्हणत भारतीय अंध क्रिकेट संघाचे कौतुक केले होते.

Related posts

अभिनेत्री गीता कपूर यांचे निधन

News Desk

‘कलंक’च्या शूटिंगसाठी आलिया-वरुण होणार कारगीलला रवाना

Gauri Tilekar

पंडित नेहरूंचे लहान मुलांसोबतचे काही निवडक क्षण

News Desk