HW News Marathi
देश / विदेश

पाकच्या ताब्यातील भारतीय कैद्यांची होणार लवकरच सुटका

वृत्तसंस्था-पाकिस्तानातील तुरुंगांमध्ये कैदेतील ५४६ भारतीय नागरिकांची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे सर्व कैदी मच्छिमार असून त्यांना सोडण्याचे संकेत पाकिस्तानने दिले आहेत.

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील २१ मे २००८ मध्ये झालेल्या राजनैतिक मदत करारानुसार, पाकिस्तान सरकारने तेथील तुरुंगांतील भारतीय कैद्यांची यादी भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावले यांच्याकडे दिली आहे. पाकिस्तानी तुरुंगांतील ५४६ कैद्यांमध्ये ५२ सर्वसामान्य नागरिक आहेत. तर ४९४ मच्छिमार आहेत, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या करारानुसार, दोन्ही देशांकडून एका वर्षात दोनदा म्हणजेच १ जानेवारी आणि १ जुलैला तुरुंगांतील कैद्यांची यादी देण्यात येते. भारत सरकारकडूनही पाकिस्तानी उच्चायुक्तांकडे भारतातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची यादी देण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. यावर्षी १ जानेवारीला पाकिस्तान सरकारने भारताकडे कैद्यांची यादी दिली होती. त्यानुसार पाकिस्तानात ३५१ भारतीय कैदी होते. त्यात ५४ सर्वसामान्य नागरिक आणि २९७ मच्छिमार होते. यावर्षी ६ जानेवारीला २१९ भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली. तर १० जुलै रोजी ७७ मच्छिमार आणि एका भारतीय नागरिकाची सुटका करणार असल्याची माहितीही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, ट्विटर आणि जी प्लसला लाईक करा

https://www.facebook.com/mahabatmi365/

https://plus.google.com/u/0/

https://twitter.com/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या नाराजीमुळे बराक ओबामाला झोप लागत नसेल ! निलेश राणेंचा टोला

Gauri Tilekar

बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलकडून अभिवादन

News Desk

संसदरत्न पुरस्कार ४ वेळा प्राप्त करणारे काँग्रेसचे खासदार राजीव सातव!

News Desk