HW News Marathi
देश / विदेश

भारताची दहशतवादाविरुद्धची लढाई ही कोणत्याही एका धर्माविरुद्ध नाही !

नवी दिल्ली | “भारत हा दहशतवादाच्या समस्येशी दोन हात करत आहे. दिवसेंदिवस जगभरात दहशतवाद फोफावत चालला आहे. दक्षिण-पूर्व आशियामध्ये तर दहशतवाद हा एका धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. भारताची दहशतवादाविरुद्धची लढाई ही कोणत्याही एका धर्माविरुद्ध नाही. जर आपल्याला मानवता टिकवायची असेल तर आपल्याला दहशतवादाला आसरा देणाऱ्या आणि आर्थिक मदत देणाऱ्या देशांना तसे न करण्यास सांगावे लागेल”, असे मत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले आहे. सुषमा स्वराज या आज (१ मार्च) ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक ऑपरेशन (ओआयएस) मध्ये बोलत होते.

“इस्लामचा अर्थ शांती असा होतो. मात्र दहशतवादाला साहाय्य करणाऱ्या देशांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. या दहशतवादी संघटनांना पुरविले जाणारे आर्थिक साहाय्य थांबविले पाहिजे”, असे आवाहनही सुषमा स्वराज यांनी यावेळी केले. सुषमा स्वराज यांनी यावेळी नाव न घेता पाकिस्तानला सुनावले आहे. इस्लामिक देशांच्या महत्त्वाच्या परिषदेत गेस्ट ऑफ ऑनर म्हणून सुषमा स्वराज यांना निमंत्रण होते. या निमंत्रणाबाबत सुषमा स्वराज यांनी आभार मानले. विशेष म्हणजे पाकिस्तानला यासाठी निमंत्रण मिळालेले नाही. म्हणून पाकिस्तानने या संमेलनावर बहिष्कार टाकला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना राज्यातील तरुणांना वडापाव विकायला लावते, अन् उद्योग बंगालला पाठवते!

News Desk

अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल

News Desk

छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांकडे पाकिस्तानी लष्कराची शस्त्रे ?

News Desk