HW News Marathi
देश / विदेश

डोकलामच्या वादात भारताचा विजय

नवी दिल्ली,रात्रीचे दोन वाजले असताना डोकलाम वादावर चर्चा करण्यासाठी विजय गोखले आणि चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांची बैठक सुरु होते. तोडगा निघावा यासाठी सुरु असलेली भारत आणि चीनमधील ही बैठक जवळपास तीन तास सुरु होती. या तीन तासांच्या चर्चेनंतर सकारात्मक विचार करत शेजारी राष्ट्रांमधील नव्या नात्याला सुरुवात झाली. दुस-या दिवशी दोन्ही देशांनी डोकलाम वादावर माघार घेत असल्याचं जाहीर केल्यानंतर इतके दिवस सुरु असलेला वाद अखेर संपला

गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात 27 ऑगस्टच्या संध्याकाळी चीनमधील भारतीय राजदूत विजय गोखले यांना सांगितलं जातं की, तुमची लवकरात लवकर भेट कशी होईल यासाठी चीन उत्सुक आहे. विजय गोखले यांच्याकडून कळवलं जातं की, मी सध्या हाँगकाँगमध्ये आहे, आणि जर बीजिंगला येणारी पहिली फ्लाईट पकडली तर मध्यरात्री पोहोचू शकेन. यानंतर जेवढ्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर बीजिंगला पोहोचण्यास त्यांना सांगण्यात येतं. डोकलामचा वाद संपवण्यासाठी चीनकडून उचलण्यात आलेलं हे पहिलं पाऊल असून, हा त्यांच्याकडून मिळालेला स्पष्ट संकेत होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ऑपरेशन लोटस | भाजपकडून काँग्रेसच्या अनेक आमदारांना पक्ष सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची ऑफर

News Desk

कुलभूषण जाधव प्रकरणी ‘आयसीजे’ करणार फेब्रुवारीत अंतिम सुनावणी 

swarit

फडणवीसांचा दिल्लीत मेट्रोने प्रवास पण टीका मुंबईच्या मेट्रोवर

News Desk