HW News Marathi
देश / विदेश

भारतात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना अधिक संरक्षण मिळते !

मुंबई | जेएनयू विद्यापीठात विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर रविवारी (५ जानेवारी) झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ देशातील ठिकठिकाणी निषेद नोंदविण्यात आला. विद्यापीठातील प्राणघातक हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष गंभीर जखमी झाली होती. या राजकीय नेते मंडळी, विविध संघटना आणि सिनेकलाकारांनी जेएनयूच्या हल्ल्याचा निषेध नोंदविला. यात अभिनेत्री ट्विंकल खन्नाने काल (७ जानेवारी) ट्वीट करत जेएनयूमधील प्राणघातक हल्ल्याचा निषेध केला.

ट्विंकल खन्ना म्हणाल्या की, “भारत हा असा देश आहे जिथे विद्यार्थ्यांपेक्षा गायींना अधिक संरक्षण मिळते. हा असा देश आहे की, ज्याने घाबरून जगण्याला विरोध केला होता. लोकांना हिंसाचाराने तुम्ही दाबू शकत नाही. तुम्ही लोकांना जितके दाबणार तितका जास्त विरोध होईल. ट्विंकलने वृत्तपत्रातील ही हेडलाईन या झालेल्या कृत्याचे तंतोतंत वर्णन करणारी आहे.” या ट्विंकल खन्नाने ट्वीट करत सरळसरळ सरकारप्रित रोष व्यक्त केला आहे. ट्विंकलाच्या या ट्वीटला अनेकांनी सहमती दर्शवली आहे.

दरम्यान जेएनयूच्या हल्ल्याचा सिनेकलाकांनी ट्वीट करत निषेध केला. यात शबाना आझमी, स्वरा भास्कर, तापसी पन्नू, राजकुमार राव, दिया मिर्झा यांसारख्या अनेक कलाकारांनी केला. अखेर काल (७ जानेवारी) पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोषसह १९ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पीएनबीच्या घोटाळ्यातील आरोपींना अटक

News Desk

दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

News Desk

देशातील विरोधी पक्षांची सरकारे आता फार टिकणार नाहीत !

News Desk