HW News Marathi
Covid-19

नौदलाची आयएनएस जलाश्व ही युद्धनौका मालदीवमध्ये दाखल

नवी दिल्ली | कोरोनाच्या या संकट काळात अनेक जण विविध राज्यांत, देशात, परदेशात अडकले आहेत. त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी नौदलाने ऑपरेशन समुद्र सेतू लॉंच केले आहे. या ऑपरेशनअंतर्गत परदेशातील भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी नौदलाची आयएनएस जलाश्व ही युद्धनौका मालदीवमध्ये पोहोचली आहे.

या आयएनएस जलाश्व सोबतच आएनएस मगर ही युद्धनौकाही या मिशनचा भाग असणार आहे. या मिशनच्या पहिल्या टप्प्यात १ हजार भारतीयंना परत आणण्यात येणार आहे.मालदिवमधून भारतात येताना सर्व नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. तसेच,या प्रवासादरम्यान, सर्व नागरिकांना कोरोनाशी संबंधित सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येणार मालदीवहून निघाल्यानंतर या युद्धनौका केरळ कोचीमध्ये येतील. सर्व प्रवाशांना तिथेच उतरवण्यात येईल. त्यानंतर संबंधित राज्यांकडे सुपूर्द करण्यात येतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य दिनी ध्वजारोहण करून जयंत पाटील दिल्या शुभेच्छा

News Desk

कदाचित मुंबई-पुण्यातील लॉकडाऊन १८ मेपर्यंत वाढू शकतो | आरोग्यमंत्री

News Desk

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा

News Desk