HW News Marathi
देश / विदेश

‘अजेय भारत, अटल भाजपा’

नवी दिल्ली | भारत कधीही कुणाला फसला नाही. कुठेही कधीही झुकला नाही, असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अजेय भारत, अटल भाजपा’ असा नारा सोमवारी दिला. पक्षाच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपावेळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करताना पंतप्रधान मोदींनी भाजपाकडून नवा नारा दिला.

भाजप कायम आपल्या सिद्धांतानुसारच वाटचाल करत रहाणार आहे, अशी ग्वाही देत नरेंद्र मोदी म्हणाले, अटलजींनी पक्षाचे विचार, संस्कार आणि नेतृत्वाला नवी उंची दिली. त्यांच्या महानिर्वाणामुळे आमचा ‘सूर्य’च जणू लोपला आहे. मात्र आमच्यासारखे तारे पक्षाच्या विचारधारेला प्रकाशाच्या दिशेने पुढे नेतील.

आम्ही सत्तेला ‘सिंहासन’ मानत नाही. सत्तेच्या आसनाला जनतेच्या सेवेचे साधन मानतो, असेही पंतप्रधानांनी यावेळी बोलताना आवर्जून म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्याजदर ‘जैसे थे’, 9.5 टक्के विकास दराचा अंदाज, RBI चे आर्थिक धोरण जाहीर

News Desk

साडेतीनशे कोटी रुपयांचा फाइन वसूल

News Desk

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपसभापती पदासाठी निवडणूक होणार 

News Desk