HW News Marathi
देश / विदेश

आनंदवार्ता ! ‘चांद्रयान- २’ चे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली | भारताची ‘चांद्रयान- २’ ही महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम आज (२२ जुलै) दुपारी होणाऱ्या दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. चांद्रयान – २ मोहिमेसोबत ‘जीएसएलव्ही-मार्क – ३’ या शक्तिशाली रॉकेटचे आज आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) काल (२१ जुलै) चांद्रयान -२ चे काऊंटडाऊन सुरू झाले होते.

‘चांद्रयान-२’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवार्यंत पोहोचण्यास ४८ दिवसांचा कालावधी लागणार आहे. जवळपास १६.२३ मिनिटानंतर ‘चांद्रयान-२’ पृथ्वीपासून १८२ किमी अंतरावर ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ रॉकेटपासून वेगळे होऊन पृथ्वीच्या कक्षेत फिरणार आहे. आता ‘चांद्रयान-२’ आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी १५ जुलैला होणारे लॉन्चिंग तांत्रिक अडचणींमुळे इस्त्रोने स्थगित केले होते. यानंतर चांद्रयान- २च्या प्रक्षेपणात शास्त्रज्ञानी काही बदल केले आहे.

चांद्रयान मोहिमेमध्ये विशेष म्हणजे दोन महिला शास्त्रज्ञांकडे या मोहिमेची धुरा देऊन ‘इस्रो’ने नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान-२ ही मोहीम राबवण्यात यश मिळाल्यास अमेरिका, रशिया, आणि चीननंतर प्रगत तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा चौथा देश म्हणून नाव जगभरात ओळखले जाणार आहे.

Live Update

  • ६ सप्टेंबरला चांद्रयान – २ चंद्रावर दाखल होणार
  • चांद्रयान – २ आता २३ दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे
  • चांद्रयान – २ अवकाशात झेपावले
  • चांद्रयान – २ दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी अवकाशात झेपावणार
  • चांद्रयान-२ या मोहीमनंतर अमेरिका, रशिया, आणि चीननंतर भारत हा चौथा क्रमांक लागणार
  • चांद्रयान- २’ श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून यशस्वी प्रक्षेपण
  • चांद्रयान-२ मोहिमेची जबाबदारी दोन महिला शास्त्रज्ञांकडे केली आहे.
  • १६.२३ मिनिटानंतर ‘चांद्रयान-२’ पृथ्वीपासून १८२ किमी अंतरावर ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ रॉकेटपासून वेगळे होऊन पृथ्वीच्या कक्षेत फिरणार आहे.
  • ‘चांद्रयान-२’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवार्यंत पोहोचण्यास ४८ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
  • १५ जुलैला होणारे लॉन्चिंग तांत्रिक अडचणींमुळे इस्त्रोने स्थगित केले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#AyodhyaJudgement : सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत जमावबंदी लागू

News Desk

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर…

News Desk

अनिल देशमुखांसह मुख्यमंत्र्यांनीही तातडीने राजीनामा द्यावा ! । नारायण राणे

News Desk