HW News Marathi
देश / विदेश

जैश-ए-मोहम्‍मदने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्‍वीकारलेली नाही !

नवी दिल्ली | “आम्‍ही जैश-ए-मोहम्‍मदला पुलवामाच्या हल्‍ल्‍याविषयी विचारले आहे. त्‍यांनी या हल्‍ल्‍याची जबाबदारी स्‍वीकारलेली नाही”, असे विधान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांनी केले आहे. कुरेशी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असा दावा केला आहे. “मसूद अजहर पाकिस्तानात असला तरी त्याची प्रकृती इतकी खालावलेली आहे कि तो घराबाहेर देखील पडू शकत नाही”, असे म्हणत कुरेशी यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला होता. भारताच्या एअर स्‍ट्राइक दरम्यान दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात ३५० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा भारताचा दाव्याबाबत कोणतेही पुरावे नाहीत, असेही कुरेशी यांनी यावेळी म्हटले आहे.

“आजच्या काळात कोणताही प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी युध्द हा पर्याय असू शकत नाही. युध्दाने दोन्ही देशांची हानी होते. युध्द हे एक आत्मघाती पाऊल ठरू शकते”, असेही कुरेशी यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत कुरेशी यांनी जैश-ए-मोहम्मदने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्‍वीकारली नसल्याचे म्‍हटले आहे. दरम्यान, त्यांचे नेमके कोणाशी बोलणे झाले याबाबत त्यांनी बोलणे टाळले आहे. यावेळी कुरेशी यांनी भारतीय माध्यमांवर देखील निशाणा साधला आहे. “भारतीय माध्यमांकडून बेजबाबदारपणे, बेपर्वाईने पाकिस्‍तानविरोधी वार्ताकंन केले जाते”, असा आरोपही कुरेशी यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, कुलभूषण जाधववर भलतेच आरोप

News Desk

चाक नादुरुस्त असल्याचे लक्षात येऊनही एक्स्प्रेस तब्बल २०० किमी चालवली

swarit

राष्ट्रवादी व्यंकय्या नायडूंना “जय भवानी जय शिवाजी” लिहिलेली २० लाख पोस्टकार्ड पाठवणार

News Desk