HW News Marathi
देश / विदेश

बॉलिवूडला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, जया बच्चन यांचा कंगनाला टोला  

नवी दिल्ली | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडवर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला होता.त्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूड माफिया आणि ड्रग्स कनेक्शन हा मुद्दा उपस्थित केला. यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह आतापर्यंत १० पेक्षा अधिक जणांना एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्स यांचं कनेक्शन आता उघड होऊ लागले आहे. मात्र बॉलिवूडला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे असा आरोप खासदार जया बच्चन यांनी केला आहे.

राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या की, बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मनोरंजन क्षेत्र दिवसाला ५ लाख लोकांना रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे आणि अन्य गोष्टींपासून लक्ष हटवण्यासाठी बॉलिवूडचा वापर केला जात आहे. सोशल मीडियात बॉलिवूडला निशाणा बनवला जात आहे. आम्हाला सरकारकडून समर्थन मिळत नाही. ज्या लोकांना या फिल्म इंडस्ट्रीजने नाव दिलं आज तेच बॉलिवूडला गटार संबोधत आहेत मी याचं समर्थन करणार नाही असे त्यांनी सांगितले.

 

तसेच या उद्योगात असे काही लोक आहेत जे सर्वाधिक कर भरतात. पण त्यांना त्रासही दिला जात आहे. चित्रपटसृष्टीसाठी अनेक आश्वासने दिली गेली परंतु ती कधीच पूर्ण झाली नाहीत. सरकारने मनोरंजन क्षेत्राच्या समर्थनात यावे. ही इंडस्टी नेहमी सरकारला मदत करण्यासाठी पुढे आली आहे. सरकारची कोणतीही चांगली कामे असतील त्याचे आम्ही समर्थन करतो. जेव्हा आपत्ती येते तेव्हा फक्त बॉलिवूडचे लोक पैसे देतात असाही त्या म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बूम बूम फेस्टिव्हलला सुरुवात

News Desk

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील जनतेला, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शुभेच्छा

News Desk

भारतातील निवडणूक काळात घेणार विषेश काळजी

News Desk