HW News Marathi
महाराष्ट्र

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी भाजपला करावीशी वाटली नाही? 

मुंबई | भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, असे भाजपला का वाटले नाही? असा प्रश्न शिवसेना प्रवक्ते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या रुपात उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी नेता संपवला, असा घणाघातही त्यांनी केला आहे.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सीबीआय करू शकते मग मुंडे यांच्यासारख्या बड्या नेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावीशी भाजपला का वाटली नाही, असे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विचारले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी उचलून धरल्याच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी भाजपला सवाल केला.

दिल्लीत ३ जून २०१४ ला गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले होते. मात्र ईव्हीएम हॅकिंगच्या माहितीमुळे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा अमेरिकन सायबर एक्स्पर्टने गेल्या वर्षी केला होता. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनी राहुल गांधींवर टिका केली नाही ,ते राहुल गांधींना समजावून सांगतील

News Desk

जी-२० बैठकीसाठी ३८ प्रतिनिधींचे काल पुणे येथे आगमन  

Aprna

ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका कीर्ती शिलेदार यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची श्रद्धांजली

News Desk