HW News Marathi
देश / विदेश

‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेवर बंदी घातल्यानंतर मेहबूबा मुफ्तींचा काश्मीरमध्ये मोर्चा

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तान एका बाजूला भारतासोबत चर्चा करण्याचा प्रस्तावसमोर ठेवते तर दुसऱ्या बाजूला सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि ‘पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी’च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमधील ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. यावरून मुफ्ती यांनी काश्मीरमध्ये मोर्चा काडून सरकारवर टीका केली आहे. मुफ्ती म्हणाल्या की, भारत-पाकिस्तान सीमा भागात सरकार जो ड्रामा करत आहे. त्याचा त्रास काश्मीरमधील सामान्य नागरिकांना होत असल्याचा आरोप मुफ्ती यांनी सरकारवर केला आहे. तसेच, ‘जमात-ए इस्लामी’वर घातलेल्या बंदीच्या विरोधात मेहबूबा मुफ्ती यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत निदर्शने केली.

दहशतवादी कारवायांच्या आरोपावरून केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी (२८ फेब्रुवारी) काश्मीरमधील ‘जमात-ए इस्लामी’ या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. ‘जमात-ए इस्लामी’ची स्थापना १९४२ मध्ये झाली असून, पाकिस्तान धार्जिणी असल्याच्या आरोपावरून या संघटनेवर आतापर्यंत तीन वेळा बंदी घालण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदारांनी आपले राजीनामे विधानसभेच्या सभापतींकडे सुपूर्द करावेत !

News Desk

महाराष्ट्रातून कांदा निर्यातबंदीचे पडसाद उमटू लागल्यानंतर फडणवीसांचे गोयल यांना पत्र

News Desk

संकटाचा मुकाबला करण्याची क्षमता खच्चून भरलेली असते तोच देश सुरक्षित असतो – पंतप्रधान

News Desk