HW News Marathi
देश / विदेश

कर्नाटकातील आमदारांचा गोव्याला जाण्याचा प्लॅन रद्द

बेंगळुरु | काँग्रेस-जेडीएस आघाडीच्या सरकारच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकातील मुख्यमंत्री कुमारस्वामीचे सरकार धोक्यात आले आहे. अवघ्या १३ महिन्यात आघाडीचे सरकार पडणार असल्याचे चित्र शनिवारी(६ जुलै)पासून स्पष्ट झाले आहे. आता २ अपक्ष आमदारांनी देखील राजीनामा देऊनस भाजपला सर्मथन दिले आहे. अपक्ष आमदार एच नागेश आणि आर शंकर यांनी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा दिल्या राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या आता १५ झाली आहे.

आमदार दिलेले बंडखोर आमदार अद्यापही अडून बसले आहेत. आमदारकीचा राजीनामा देणारे बंडखोर नेते आज (९ जुलै) गोव्याला जाणार होते. मात्र त्यांनी अचानक आमदारांचा हा प्लॅन रद्द करण्यात आला असून त्यांनी मुंबईत थांबण्याचा निर्णय घेतला. सध्या मुंबईतील अज्ञातस्थळी सर्व बंडखोर आमदार वास्तव्यास आहेत. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा कर्नाटकातील राजकीय नाट्याच्या केंद्रस्थानी आली आहे.

सोमवारी (८ जुलै) सकाळी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत बंडखोर आमदारांना मंत्रिपदांची ऑफर देण्यात आली. मात्र सध्याचे काँग्रेस सरकार अस्थिर असल्याचे म्हणत या आमदारांनी मंत्रिपदे स्वीकारण्यास नकार दिला. माहितीनुसार कर्नाटकचे राज्यपाल १७ जुलै रोजी विधानसभेत बहुमत सादर करण्याचे आदेश देऊ शकतात. कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांची संख्या सातत्याने घटत आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २२४ जागा आहेत. बहुमतासाठी ११३ आमदारांची आवश्यकता आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बॉलिवूडचा सोनेरी आवाज काळाच्या पडद्याआड; बप्पी लहरी यांचं निधन

Manasi Devkar

 मुंबई विमातळावर भारतीय हवाई दलाचे मालवाहक विमान धावपट्टीवरून घसरले

News Desk

“मविआ सरकारने एक उमेदवार मागे घ्यावा, मग घोडेबाजाराचा प्रश्नच उरत नाही,” फडणवीसांची प्रतिक्रिया

Aprna