HW News Marathi
देश / विदेश

केरळ माझ्यासाठी वाराणसी ऐवढेच महत्त्वाचे | पंतप्रधान मोदी

तिरुवनंतपुरम | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (८ जून) केरळचा दौरा करून तेथील जनतेचे आभार मानले. केरळ माझ्यासाठी वाराणसी ऐवढेच महत्त्वाचे असल्याचे मोदी म्हणाले. पुढे मोदी असे देखील म्हटले की, ज्यांनी आम्हला निवडून दिले ते आमचे आहेत, आणि ज्यांनी आम्हाला निवडून दिले नाही. देखील आमचेच असल्याचे केरळच्या सभेत संबोधिक करताना म्हणाले.

मोदी हे आज सकाळी केरळमध्ये दाखल झाले. त्यानंतर मोदींनी गुरुवायूर येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरात पूजा केली. यावेळी मोदींची पद्मतुला करण्यात आली. त्यानंतर सभेला संबोधित करताना मोदींनी केरळमधील जनतेचे आभार मानले. आम्ही भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीच्या राजकारणासाठी मैदानात उतरत नाही. आम्ही ३६५ दिवस जनतेच्या सेवेमध्ये व्यस्त असतो. आम्ही केवळ सरकार स्थापन करण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. आम्ही देश घडवण्यासाठी राजकारणात उतरलो आहोत. जनता आम्हाला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी बनवते. मात्र आम्ही जनसेवक आहोत, जनप्रतिनिधी आजीवन असतात, असेही मोदींनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिला सुरक्षेसाठी सरकारने कठोर कारवाई आणि कायदे करण्याची गरज !

swarit

‘किसान क्रांती पदयात्रा’ आंदोलन अखेर मागे

swarit

जय जय पांडुरंग हरी ! पंतप्रधानांची विठ्ठल चरणी प्रार्थना

News Desk