HW News Marathi
देश / विदेश

‘किसान क्रांती पदयात्रा’ आंदोलन अखेर मागे

नवी दिल्ली | ‘किसान क्रांती पदयात्रा’ आंदोलन अखेर मध्यरात्री मागे घेण्यात आले. भारतीय किसान युनियनची हरिद्वारहून निघालेली किसान क्रांती यात्रा राजधानी नवी दिल्ली येथील किसान घाटावर जाण्यास परवानगी दिली. यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. उत्तर प्रदेश-दिल्ली सीमेवर मंगळवारी (२ ऑक्टोबर) किसान क्रांती पदयात्रा काढण्यात आली होती.

 

 

या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांबरोबर आरपीएफ, पॅरामिलिटरी फोर्स सुद्धा तैनात करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात येत आहे. तसेच उत्तर प्रदेशाच्या सीमेजवळ असलेल्या दिल्लीच्या पूर्व भागात पोलिसांनी जमावबंदी (१४४ कलम) लागू केली आहे. आलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन किसान घाटावर जाण्याची परवानगी दिली.

 

‘शेतकऱ्यांनी किसान घाटवर फुले वाहून आम्ही आमचे आंदोलन मागे घेतले आहे. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात असून आमच्या मागण्या पुर्ण झालेल्या नाहीत.’ असा आरोप भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैट यांनी केला असून आंदोलन मागे घेतल्यानंतर शेतकरी घरी परतण्याचे आवाहन केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या विरोधात एकत्र येण्याची वेळ, ममता बॅनर्जींचं सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंना पत्रं

News Desk

मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची ‘हार्वर्ड बिझनेस स्कुल’च्या डीनपदी नियुक्ती, राज ठाकरेंची पोस्ट

News Desk

काही लोकं दलालांना मदत करण्याचा प्रयत्न करतायत, मोदींचा शेती विधेयकावरून टोला!

News Desk