HW News Marathi
देश / विदेश

Lakhimpur Kheri violence case: मुख्य आरोपी आशिष मिश्राला जामीन मंजूर

मुंबई | लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आज (१० फेब्रुवारी) पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. आशिष मिश्रा यांचा जामीनपत्र भरल्यानंतर उद्या त्यांना तुरुंगातून सुटका होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात आशिष मिश्रांना जामीन मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकारण तापण्याची शक्ता वर्तवली जाऊ शकते. या निवडणुकीत आशिष मिश्रा यांचा पक्षाला काय फायदा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. 

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांचे शांततापूर्ण आंदोलन सुरू होते. तेव्हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मागून येऊन त्यांच्या गाडीखाली चिरडल्याचा आरोप आहे. या घटनेत ४ शेतकरी आणि एक पत्रकारांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मिश्रा आणि त्यांच्या मुलाविरोधात संताप व्यक्त केला गेला होता. यानंतर आशिष मिश्रासह १४ अटक करण्यात आली असून सध्या ते जेलमध्ये आहेत.

दरम्यान, आशिष मिश्रा यांच्यावर एसआयटीने ५००० पानांचे आरोपत्र बनवण्यात आले होते. या प्रकरणात आशिष मिश्रासह १६ जणांवर आरोप करण्यात आले आहे. एसआयटीच्या तपासात १७ वैज्ञानिक पुरावे आणि २४ व्हिडिओ फोटो सापडले. या घटनेचे २०८ जणांनी साक्ष दिली आहे, असे एसआयटीच्या आरोपपत्रात लिहिले. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आशिष मिश्रा त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रियायन्स जिओमध्ये आणखी एका अमेरिकी कंपनीची गुंतवणूक

News Desk

शिवजयंतीनिमित्त पंतप्रधानांनी महाराजांना केले नमन

News Desk

डॉ. उमर अहमद इलयासी यांनी मोहन भागवत यांचा ‘राष्ट्रपिता’ म्हणून उल्लेख

Aprna