HW News Marathi
देश / विदेश

एका सच्च्या पत्रकाराचे पंतप्रधानांना पत्र

नवी दिल्ली: मोदी सरकारने सर्व माध्यमांच्या मालकांना खरेदी करून आपल्या खिशात ठेवले आहे. केवळ सोयीच्या बातम्या प्रसिद्ध करून घेण्यावर सरकारचा भर आहे. त्यातू कोणी टीका करणार असेल तर त्याला लक्ष्य करण्यासाठी संपूर्ण भाजप व त्यांची आॅनलाइन टीम काम करते. अशाच प्रकारे एनडीटीव्ही विकण्यात आल्याची बातमी पसरवून गैरसमज निर्माण करण्यात आल्या. यावर एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फेसबुकवरून खुले पत्र लिहिले आहे.

या पत्रातून त्यांनी पंतप्रधानांना काही झोंबणारे प्रश्न विचारले आहेत. सोशल मीडियावर भाजप समर्थकांकडून ओलांडली जाणारी सभ्यतेची मर्यादा, एनडीटीव्ही समूह विकला जाणार असल्याच्या चर्चा यावर रवीश कुमार यांनी पत्रातून भाष्य केले आहे.

‘सध्या सोशल मीडियावर विरोध करताना सभ्यतेच्या किमान मर्यादांचे उल्लंघन केले जात आहे. अशा लोकांमध्ये भाजप समर्थकांसह, उजव्या विचारांच्या संघटनाचे समर्थक आणि त्यांना विरोध करणाºया लोकांचाही समावेश आहे. मात्र, मर्यादा सोडणाºया लोकांपैकी काहींना तुम्ही ट्विटरवर फॉलो करता, हे सर्वात दु:खद आहे,’ अशा शब्दांमध्ये रवीश कुमार यांनी मोदींवर टीका केली. ‘अतिशय शेलक्या शब्दांमध्ये टीका करणाºया, पातळी सोडणाºया लोकांना तुम्ही ट्विटरवर फॉलो करता. सार्वजनिकरित्या या गोष्टींची चर्चा झाल्यावरही तुमच्या भूमिकेत कोणताही बदल होत नाही. हे तुम्हाला आणि तुमच्या पदाला शोभून दिसत नाही,’ असेही रवीश यांनी म्हटले आहे.

‘काही खास योग्यता असल्यामुळेच तुम्ही एखाद्या व्यक्तीला फॉलो करत असाल. धमकी देणे, शिवीगाळ करणे आणि जातीयवादी विचार मांडणे, या सगळ्या गोष्टींना तुम्ही योग्यता समजत नसाल, अशी पूर्ण आशा मला आहे,’ असा टोला त्यांनी मोदींना लगावला. ‘मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही खरेच नीरज दवे आणि निखिल दधीचला फॉलो करता का? तुम्ही त्यांना फॉलो का करता?’, असे सवाल रवीश यांनी विचारले आहेत.

मोदींना लिहिलेल्या खुल्या पत्रात रवीश कुमार यांनी एनडीटीव्ही समूह विकला जाणार असल्याच्या चचेर्चाही उल्लेख केला आहे. ‘मी एक सामान्य नागरिक आणि सजग पत्रकार आहे. तुमच्या कृपेमुळे लवकरच मी रस्त्यावर येणार आहे. माझी नोकरी जाणार आहे, म्हणून सोशल मीडियावर काही दिवसांपासून आनंद व्यक्त केला जातो आहे. सरकार माझ्या मागे लागले असल्याचे काहींनी म्हटले आहे,’असे म्हणत रवीश यांनी मोदींवर निशाणा साधला.

‘काही दिवसांपूर्वीच हिंदुस्तान टाईम्सचे संपादक बॉबी घोष यांना तुमच्या नाराजीमुळे नारळ देण्यात आल्याची बातमी ‘द वायर’वर वाचली. त्यानंतर आता माझा नंबर असल्याचे अनेकजण म्हणतात. हे सर्व वाचून हसू येते, मात्र चिंताही वाटते. भारताचा एक सामर्थ्यवान पंतप्रधान एका पत्रकाराला नोकरीवरून काढू शकतो, यावर विश्वास ठेवावासा वाटत नाही,’ अशा तिरकस शब्दांमध्ये त्यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले. ‘लोक म्हणतात, आता तुमचे थोडेच दिवस उरलेत. तुमचाही बंदोबस्त केला जाईल. खरेच असे काही होईल का?,’ असा सवाल त्यांनी मोदींना विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…सरकारला काळे कायदे रद्द करावे लागतील”, राहुल गांधींचं केंद्राला आव्हान!

News Desk

#PulwamaAttack : संयुक्त राष्ट्राकडून दहशतवादी जाहीर केलेल्या संघटनांची खाती ब्लॉक करा !

News Desk

आता अवघ्या चार तासांमध्ये उपलब्ध होणार पॅनकार्ड

News Desk