HW News Marathi
देश / विदेश

उत्तर भारतातील महापुरामुळे जनजीवन विस्कळीत

मुंबई | उत्तर भारतात आलेल्या महापुरात आसाम आणि मणिपूर या राज्यांना देखील महापुराचा फटका बसला आहे. गेल्या 24 तासात या महापुरामुळे आसाममध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला असून मणिपूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर या महापुरात आतापर्यंत 23 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पूरस्थिती हळूहळू कमी होत असुन अद्याप जनजीवन विस्कळीत झालेले आहे.

एएसडीएमएने दिलेल्या माहितीनुसार या पुराचा फटका 716 गावांना बसला असुन यात 3,292 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. होजाई, कर्बी आंगलांग पूर्व, कर्बी आंगलांग पश्चिम, गोलाघाट, करीमगंज, हैलाकांडी आणि कछार या भागात 4.25 लाखांहून अधिक लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. रेल्वे अधिका-यांककडून मिळालेल्या माहितीनुसार, बंदरखल दमचारा स्टेशन दरम्यान भूस्खलन झाले आहे. यामुळे लुमडिंग-बदरपूर खंड दरम्यान रेल्वेसेवा ठप्प आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ईशान्य भारतातील मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल

swarit

जाणून…घ्या ‘ए-सॅट’ म्हणजे काय आहे ?

News Desk

“तुमची लेकरं परदेशात शाळेत अन आमची कायम ऊसाच्या फडात”, पंकजा मुंडेंची पोस्ट व्हायरल

News Desk