HW News Marathi
देश / विदेश

आम्ही युद्धाची तयारी करत नाही, उलट भारत आमच्यावर युद्ध लादत आहे !

नवी दिल्ली | पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराकडून पहिल्यांदा पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. “आम्ही युद्धाची तयारी करत नाही, उलट भारत आमच्यावर युद्ध लादत आहे.” असे बोलून पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन भारताने केलेले आरोप पाकने फेटाळून लावले आहेत. पाक मेजर गफूर पुढे असे देखील म्हणाले की, आम्ही युद्धासाठी तयार नसलो तरी भारताचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत.”

पुलवामा हल्ल्यासाठी भारतच जबाबादार असल्याचा अजब आरोप पाकिस्ताने लावला असून ज्या ठिकाणी पुलवामानातील सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला, ते ठिकाण नियंत्रण रेषेपासून खूप दूर आहे. त्यामुळे पाकिस्तानातील एखादी व्यक्ती तिथंपर्यंत पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे या हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार कसा?’, असा उलटा सवाल पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल यांनी उपस्थित केले आहे.

भारताकडून दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोपदेखील पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आला. भारतात ज्यावेळी निवडणुका येतात, त्यावेळी दहशतवादी हल्ले होतात. ‘२००१ मध्ये भारताच्या संसदेवर हल्ला झाला. २००२मध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होत्या. २००८ मध्ये मुंबईवर हल्ला झाला. २००९ मध्ये भारतात निवडणूक होती. या दोन्ही घटनांचा तर्क लावून पाकिस्तानने पुलवामात हल्लेचे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा पाककडून केला आहे. उलट भारतात लोकसभा निवडणुका असल्यामुळे हा हल्ला झाल्याचे आरोप पाकिस्तानी लष्कराने भारतावरच केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानकडून गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी, इम्रान खानकडून टीमचे अभिनंदन

News Desk

सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून आयईडी ब्लास्ट

News Desk

भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी देखील त्रस्त

News Desk