HW News Marathi
देश / विदेश

“जनतेच्या हितासाठी पंतप्रधानांचे पाय धरायलाही तयार, सूडाचे राजकारण बंद करा!” – ममता बॅनर्जी

नवी दिल्ली | यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (२८ मे) पश्चिम बंगाल दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पाहणी नंतर घेतलेल्या आढावा बैठकीस मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अर्धा तास उशीराने आल्याने, पंतप्रधानांना वाट पाहावी लागल्याचे समोर आले होते. या मुद्यावरून आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जी व मोदी सरकारमध्ये नव्या वादाला सुरूवात झाल्याचे दिसत आहे.

या संदर्भात भाजपकडून टीका होऊ लागल्यानंतर आता, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून देखील प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. तसेच, जनतेच्या हितासाठी मी पंतप्रधान मोदींचे पाय धरायलाही तयार आहे, मात्र सूडाचे राजकारण बंद करा. असं ममता बॅनर्जींनी आज पत्रकारपरिषदेत म्हटलं आहे.

बैठक मला अपमानित करण्यासाठी होती

या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींवर आरोप देखील केले आहेत. ही बैठक मला अपमानित करण्यासाठी होती. मी पंतप्रधान मोदींना वाट पाहायला नाही लावली, उलट मलाच पंतप्रधानांना भेटण्यासाठी वाट पाहावी लागली, असं ममता बॅनर्जींनी सांगितलं आहे.

हे सुडाचं राजकरण थांबवा

यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “मला वाईट वाटलं. पीएमओने प्रसारित केलेली एकतर्फी माहिती चालवून त्यांनी माझा अपमान केला. जेव्हा मी काम करत होते, तेव्हा ते हे करत होते. जनतेच्या हितासाठी मी तुमचे पाय धरयला तयार आहे. मात्र हे सूडाचे राजकारण थांबवा.”

तसेच, “मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, अशाप्रकारे माझा अपमान करू नका. बंगालला बदनाम करू नका. माझे CS, HS आणि FS प्रत्येक वेळी बैठकीत सहभागी होत आहेत. ते केंद्रासाठी काम करत आहेत, ते राज्यासाठी कधी नोकरी करणार? तुम्हाला वाटत नाही का? हा राजकीय प्रतिशोध आहे.” असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.

“आमची काय चूक होती? मागील दोन वर्षांत विरोधी संसदीय विरोधी नेत्यांची का आवश्यकता भासली नाही किंवा गुजरातमध्ये विरोधी पक्ष नेत्यांना (बैठकीत) का बोलावलं जात नाही? जेव्हा मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राज्यपालांनी कायदाव व सुव्यवस्थेबाबत भाष्य केलं व केंद्राची पथकं पाठवली गेली होती.” असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बोलून दाखवलं आहे.

भाजपाकडून होत असलेल्या टीकेला तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी उत्तर देत पलटवार केला. “३० मिनिटं उशीर झाल्याच्या कथित विलंबावरून इतका गोंधळ? भारतीय सात वर्षांपासून १५ लाख रुपयांची वाट बघताहेत. लोक एटीएमबाहेर तासन् तास वाट बघत आहेत. लशीसाठी अनेक महिन्यांपासून वाट बघत आहेत. कधी कधी थोडी प्रतीक्षा तुम्हीही करा,” असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकार आणि भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अलास्कात ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

News Desk

निवडणूक आयोगाने भाजपला खडसावलं; प्रचारसाहित्यांमधून ‘पप्पू’ शब्द वगळण्याचे आदेश

News Desk

… तशी भाषा शत्रू राष्ट्रांचे नेतेसुद्धा बोलू शकत नाही !

News Desk