HW News Marathi
देश / विदेश

तरुणाची शहीदांना ‘ही’ अनोखी श्रद्धांजली

नवी दिल्ली | पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली असून देशातील ठिकठाकणाहून शहीद वीर जवानांना कॅडेल मार्च आणि मोर्चे काढून श्रद्धांजली वाहिली जात आहे. परंतु दिल्लीच्या एका तरुणाने मात्र शहीद जवानांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे. या तरुणाने चक्क स्वतःच्या शरीरावर तब्बल ५९१ टॅटू गोंदवले आहेत. ३० वर्षीय अभिषेक गौतम असे तरुणाचे नाव आहे. या अभिषेक इंटिरिअर डिझायनर आहे. कारगील युद्धात वीरमरण आलेल्या ५५९ सैनिकांची नावे आणि काही अनेक थोर व्यक्तींच्या प्रतिमेचे टॅटू त्यांनी त्यांच्या शरीरावर गोंदले आहेत.

हे टॅटू काढण्यासाठी अभिषेकला आठ दिवस लागेल असून जूनपासून तो त्यांच्या बाईकवरून संपूर्ण देशभरात जळपासू १५ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या प्रवासात देशासाठी शहीद झालेल्या कुटुंबीयांची प्रत्येक दिवशी भेट घेणार आहे. अभिषेकच्या प्रवासाची सुरुवात २४ ते २६ जुलैदरम्यान कारगीलपासून होणार आहे. या बदल अभिषेकला विचारले असता त्यांनी उत्तर दिले की, “मला माहिती आहे की, अनेकांना युद्ध हवे आहे, परंतु युद्ध हा उपाय नव्हे. युद्धादरम्यान खूप जवान मारले जातील.”

‘दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचा वरदहस्त आहे. जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानी सैन्याचेच अपत्य आहे,” असा थेट निशाणाच भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केला आहे. तसेच आगामी काळातही दहशतवाद्यांविरोधातील मोहीम राबवली जाईल आणि काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा केला जाईल. त्यांना जिवंत सोडले जाणार नाही’, असेही भारतीय लष्कराने कडक शब्दात सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभेत उपसभापती पदासाठी मतदानाला सुरुवात

swarit

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंबई ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन

News Desk

पंतप्रधान केरळमध्ये दाखल, केरळच्या पूरस्थितीची हवाई पाहणी करणार

News Desk