HW News Marathi
देश / विदेश

राहुलच्या महाआघाडीच्या प्रयत्नांवर मायावतीने पाणी फेरले

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस सर्व विरोधकांना एकत्र आण्याचा प्रयत्न करुन महाआघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ही महाआघाडी भाजपविरोधात सर्व विरोधक काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली एकत्र येण्याची जोरदार मोर्चेबांधणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रयत्न करत होते.परंतु मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेससोबत आघाडी न करण्याची बसपा अध्यक्ष मायावती यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या महाआघाडीच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठे आव्हान देण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. काँग्रेस मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही राज्यात वर्षाच्या शेवटी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी काँग्रेस या तिन्ही राज्यातील छोट्या पक्षांनासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांचा होता. बसपाचे महासचिव सतीशचंद्र मिश्रा आणि मध्य प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांच्या बैठक झाली होती. परंतु चर्चेतून काहीच निष्कर्षसमोर आले नाही. यांतर मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाड नकरण्याच्या निर्णयाची घोषणा केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

न्यायाधीशांची भरती करताना अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण देण्यात यावे !

News Desk

माहिती अधिकारातील बदल म्हणजे जनतेचा विश्वासघात !

News Desk

298 भारतीय झाले पाकिस्तानी!

News Desk
महाराष्ट्र

येत्या दोन दिवसात राज्यात तुरळक पाऊस, पुणे वेधशाळेचा अंदाज

Gauri Tilekar

पुणे | येत्या दोन दिवसांमध्ये राज्यासह गोव्यातसुद्धा तुरळक पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शुक्रवारी मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, परंतु विदर्भात मात्र हवामान कोरडे राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये सलग तीन दिवस अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे तेथील वादळी वाऱ्यामुळे पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

जिल्ह्यात सतत होणाऱ्या पावसामुळे ऊसासह अन्य भाजीपाल्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उमरगामध्ये बुधवारी ८१ मिमी एवढा पाऊस झाला आहे. तर मुरूममध्ये २१ तर डाळिंबला २४ मिमी पासवसाची नोंद झाली आहे. भूम तालुक्यतील पाटसांगवी परिसरात वांगी व कारल्याचा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

याआधीही राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि खान्देशात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत वारे ताशी ५५ ते ७५ किलोमीटर वेगाने वाहत असल्याने सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नाताळच्या शुभेच्छा

Aprna

राज्यातील शाळांना अनुदानासाठी ११६० कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता

Aprna

नांदेडमधील होल्ला मोहल्ला कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांच्या गाड्या फोडल्या!

News Desk