HW News Marathi
देश / विदेश

राहुलच्या महाआघाडीच्या प्रयत्नांवर मायावतीने पाणी फेरले

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस सर्व विरोधकांना एकत्र आण्याचा प्रयत्न करुन महाआघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ही महाआघाडी भाजपविरोधात सर्व विरोधक काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली एकत्र येण्याची जोरदार मोर्चेबांधणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रयत्न करत होते.परंतु मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेससोबत आघाडी न करण्याची बसपा अध्यक्ष मायावती यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या महाआघाडीच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठे आव्हान देण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. काँग्रेस मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही राज्यात वर्षाच्या शेवटी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी काँग्रेस या तिन्ही राज्यातील छोट्या पक्षांनासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांचा होता. बसपाचे महासचिव सतीशचंद्र मिश्रा आणि मध्य प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांच्या बैठक झाली होती. परंतु चर्चेतून काहीच निष्कर्षसमोर आले नाही. यांतर मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाड नकरण्याच्या निर्णयाची घोषणा केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विमान प्रवासात संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणास अटक

News Desk

घडामोडींना वेग ! अजित पवार, जयंत पाटलांसह शरद पवारांची दिल्लीत तातडीची बैठक

News Desk

Goa election 2022: भूमाफिया, भ्रष्टाचारी आणि ड्रग्ज माफियांच्या हाती गोव्याच्या राजकारणाची सूत्रे! – संजय राऊत

Aprna
देश / विदेश

शोपियानमध्ये २ दहशतवाद्यांना जवानांनी घेरले

News Desk

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सोमवारी (३ डिसेंबर) पहाटेपासूनच जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. शोपियान जिल्ह्यातील सनग्रान परिसरात एक घरामध्ये तीन दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना मिळाली. यानंतर जवानांनी या संपुर्ण परिसराला घेराव घातला आहे. भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि एसओजी यांनी दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम सुरू आहे. त्यानुसार सनग्रानमध्ये एका घरात दहशतवादीलपल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केल्यानंतर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे.

दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात शनिवारी (२४ नोव्हेंबर) मध्यरात्री सुरू होऊन रविवारी सकाळपर्यंत सुरू राहिलेल्या सशस्त्र चकमकीत सुरक्षा दलांनी ६ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. संशयित दहशतवादीम्हणून मारल्या गेलेल्या सहांपैकी पाच जण स्थानिक युवक होते. सहावा पाकिस्तानी नागरिक असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर लगोलग करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.

Related posts

धक्कादायक ! राफेल कराराची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला, महाधिवक्त्यांची माहिती

News Desk

कश्मीरचे पुन्हा नंदनवन बनो!

News Desk

CDS बिपीन रावत यांना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk