HW News Marathi
देश / विदेश

भारत-पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द

नवी दिल्ली | संयुक्त राष्ट्र संघ (यूएनजीए) मध्ये भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांची होणार मुलाखत रद्द झाली. मुलाखत रद्द झाल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी माध्यमांना दिली. रवीश कुमार यांनी पुढे असे म्हटले की, पाकिस्तानच्या प्रधानमंत्री इमरान खान यांचा खरा चेहरा समोर आला आहे.

या दोन्ही देशांच्या मंत्र्यांमुध्ये होणाऱ्या मुलाखती होण्यापुर्वीच संभ्रमचे वातावरण असताना भारत-पाक सीमेवर भारतीय लष्कराच्या शहीद जवानांचा मृत्युशी पाकिस्तानच्या सेन्यांनी विटंबना केली. तसेच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. या सर्व घटनामुळे भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास नकार दिला आहे.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघ (युएनजीए)मध्ये पाकिस्तानी पराराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्याशी मुलाकात होणार होती. परंतु पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सतत घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू असतो.

Related posts

पुढील लोकसभेसाठी विरोधकांनी एकत्र यावे!

News Desk

ठाकरेंचा मोदींना पाठिंबा

News Desk

आयटी रिटर्न्स भरण्याकरिता पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक करणे अनिवार्यच

News Desk