HW News Marathi
देश / विदेश

#MeToo : जेव्हा झालं तेव्हाच तोंड का उघडलं नाही ?

नवी दिल्ली। गेल्या अनेक दिवसांत #MeToo मोहिमेमुळे केवळ सिनेसृष्टीत नाही तर राजकीय, शैक्षणिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रात देखील धुमाकूळ घातला आहे. आता #MeToo चळवळीबद्दल ‘कहो ना प्यार है’ मधील गाण्यांमुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केलेले गायक लकी अली यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ‘लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रियांनी इतक्या वर्षांनंतर बोलणं चुकीचं आहे. जेव्हा सगळं घडत होतं, तेव्हाच त्यांनी तोंड का नाही उघडलं’, असा प्रश्न गायक लकी अली यांनी केला आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक आरोपांनंतर देशभरात #MeToo चे वादळ उठले होते.

नोएडा इथे झालेल्या एका लाइव्ह कार्यक्रमाच्या प्रसंगी गायक लकी अली ‘मीटू’ चळवळीबद्दल बोलत होते. ‘चुकीची गोष्ट फार काळ लपून राहत नाही. मग तुम्ही कितीही प्रयत्न करा. मौजमजा केलीय तर ती बाहेर येणारच’, असे वादग्रस्त वक्तव्य लकी अली यांनी केले आहे. ‘खरंतर या घाणेरड्या गोष्टी आधीच बाहेर यायला हव्या होत्या. आता अचानक प्रत्येकाला आठवू लागलंय की माझ्यासोबत असं झालं, तसं झालं. हे सगळंच हास्यास्पद आहे,’ असे लकी अली यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस आणि राज्यपालांच्या भेटीबद्दल राजकीय वर्तृळात रंगल्या चर्चा

News Desk

कोरोना काळात मोठा दिलासा! इमरजन्सी हेल्थ सेवांसाठी RBI ने दिले 50,000 कोटी

News Desk

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम सरकारचे आहे – शरद पवार

News Desk