HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकारची आता ‘नाणेबंदी’

नवी दिल्ली – भारतात मुंबई, नोएडा, कोलकाता आणि हैदराबाद या चार ठिकाणच्या सरकारी टांकसाळमध्ये नाणे निर्मिती बंद करण्यात आल्याची माहिती आरबीआयच्या अधिका-याकडून मिळाली आहे. नोटा बंदीनंतर नाणे बंदी करुन मोदी सरकार आणखी एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे.

मोदी सरकारने भ्रष्टाचारवर नियंत्रण ठेवण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० हजाराच्या नोटा बंदीचा मोठा निर्णय घेतला. त्यानंतर आरबीआयने ५०० आणि २००० हजाराच्या नवीन नोटा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहचल्या. नोटा बंदीनंतर मोठ्या प्रमाणात नाणे बनवण्यात आले होते. पण नोटा बंदी हा निर्णय सर्वसामान्यांसाठी खूपच त्रासदायक ठरला होता.

आरबीआयच्या स्टोरमध्ये नाण्यांचा मोठा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नाणे छपाई बंद करण्यात आले आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत नाणे छपाईचे काम बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी प्रविण दरेकर यांची निवड

News Desk

लोकसभा निवडणूक वेळेवरच, मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती

News Desk

जाणून घ्या…भाजपच्या विधान परिषदेच्या ४ उमेदवारांबद्दल ही माहिती 

News Desk
देश / विदेश

नागरिकतेवर प्रश्न उपस्थित करणे यासारखे दुर्दैव नाही – हमीद अन्सारी

News Desk

नवी दिल्ली – जमावांकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीची निर्घृणपणे करण्यात येणारी हत्या, ‘घरवापसी’, यांसारख्या घटना घडत असतील, तर ही भारतीय मूल्य कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तुमच्या भारतीय नागरिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे, यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ आज गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

‘देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना आहे. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात मी गेलो, त्यावेळी मला असेच संशयाचे बोल ऐकायला मिळाले. बेंगळुरूला गेलो तेव्हाही मी हेच ऐकले आणि उत्तर भारतातून तर मोठ्या प्रमाणात असेचऐकायला मिळते,’ असेही अन्सारी म्हणाले. देशभर सुरू असलेल्या तीन तलाकवर बोलताना अन्सारी म्हणाले की, तीन तलाकच्या अनुचित प्रथेबद्दल दुमत होऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, कारण कोणताही बदल समाजामधूनच होत असतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन पुर्णपणे उघडणार नसल्याचे पंतप्रधानांनी दिले संकेत

News Desk

#Lockdown 2: भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन , पंतप्रधानांची मोठी घोषणा

News Desk

कोरोना व्हायरसच्या विळख्यातून ९० भारतीय मायदेशी परतले

swarit