HW News Marathi
देश / विदेश

अत्याधुनिक रायफल्स उत्पादनाच्या रशियाच्या प्रस्तावाला मोदी सरकारचा नकार

नवी दिल्ली | अदानी समूहासोबत अत्याधुनिक रायफल्सच्या उत्पादनात भागीदारी करू इच्छिणाऱ्या रशियाच्या प्रस्तावाला मोदी सरकारने नकार दिला आहे. अदानी समूहासोबत एके प्रकारातील अत्याधुनिक रायफल्सची निर्मिती करण्यासाठी रशिया इच्छुक होते.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या लवकरच रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी अत्याधुनिक रायफल उत्पादनासंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन देशांतील करारादरम्यान त्या देशातील खाजगी कंपनीचे नाव सुचविणे योग्य नाही, हा नियम दाखवत सरकारने या प्रस्तावास नकार दिला.

या आधी राफेल करारावरून पेटलेल्या राजकारणामुळे मोदी सरकारकडून रायफल उत्पादनाचा हा प्रस्ताव नाकारण्यात आल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. राफेलच्या किंमतीसोबतच, विमान बांधणीचा कोणताही संबंध आणि अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेलचे कंत्राट का दिले गेले, असे प्रश्न उपस्थित करून काँग्रेसने वारंवार भाजपवर टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

येत्या शैक्षणिक वर्षांपासून शिक्षणसंस्थांमध्ये १० टक्के आरक्षण

News Desk

मराठा आरक्षणावर ८ ऑगस्टला राहुल गांधी यांची बैठक 

swarit

BiharElection: तेजस्वी यादव यांनी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुसंडी मारली  

News Desk
देश / विदेश

पेट्रोलचे दर ४८ रुपयांपेक्षा जास्त असणे म्हणजे जनतेचे शोषण | सुब्रमण्यम स्वामी

News Desk

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवा उच्चांक गाठत आहेत. त्यातच आज भाजपाच्या नेत्यांकडूनच दिवसेंदिवस होत असलेल्या महागाईवर टीका करण्यात आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी वाढत्या इंधनाच्या दरांवरुन केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. पेट्रोलचे दर ४८ रुपयांपेक्षा जास्त असणे म्हणजे जनतेचे शोषण आहे, अशी टीका सुब्रमण्यम स्वामींनी सरकारवर केली आहे.

कायमस्वरुपी पेट्रोलचे कमाल दर ४८ रुपये प्रतिलीटर असायला हवेत. सरकारने पेट्रोलचे दर ४८ रुपयांपेक्षा कमी करायला हवेत. सरकार लोकांकडून यापेक्षा जास्त पैसे वसूल करत असेल, तर ते जनतेचे शोषण आहे, असे स्वामी म्हणाले आहेत.

मंगळवारी ४ सप्टेंबरला पेट्रोल प्रति लिटर १६ पैशांनी तर डिझेल प्रति लिटर २० पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८६. ७२ रुपयांपर्यंत पोहोचले असून डिझेलचे दर प्रति लिटर ७५. ७४ रुपयांपर्यंत पोहोचलेले पहायला मिळत आहेत. या इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला पडताना पहायला मिळत आहे.

 

Related posts

भाजपमध्ये प्रवेश करणार नाही- सचिन पायलट

News Desk

मोदी सरकारने कृषी कायद्याला २ वर्षे नव्हे कायमची स्थगिती द्यावी !

News Desk

अर्णब गोस्वामींना अटक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला! अमित शाहांचा ठाकरे सरकार निशाणा

News Desk