HW News Marathi
देश / विदेश

आर्थिक घोटाळ्यांच्या बाबतीत मोदी सरकार ‘झिरो टॉलरन्स’

नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यादांच प्रतिक्रिया दिली आहे. आर्थिक घोटाळ्यांच्या बाबतीत मोदी सरकारचे धोरण हे ‘झिरो टॉलरन्स’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीत सुरु असलेल्या ‘ग्लोबल बिझनेस समिट’मध्ये ते बोलत होते.

सरकार आर्थिक विषयांशी संबंधीत अनियमितते विरोधात मोठी कारवाई करत असून भविष्यातही करत राहणार आहे, असे पंतप्रधानांनी शुक्रवारी ठामपणे सांगितले. पीएनबी घोटाळ्याचा त्यांनी प्रत्यक्ष उल्लेख केलेला नसला तरी याच मुद्यावर ते बोलल्याचे स्पष्ट होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करदिलासा मिळण्याचे संकेत

News Desk

सोनेरी अक्षरांनी लिहावा असा आजचा दिवस, २४ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार !

News Desk

भारतात असुरक्षित वाटणाऱ्या लोकांना बॉम्बने उडवा !

News Desk
महाराष्ट्र

आतापर्यंत माझी दोस्ती बघितली; पण आता दुश्‍मनीही बघावी लागेल : वसंत मोरे

News Desk

पुणे | महापालिकेच्या सभेत दहा कोटी रुपयांच्या प्रस्तावावरुन सत्ताधारी भारतीय पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. “माझ्यावर बिनबुडाचे आरोप करू नयेत. नाही तर, आतापर्यंत वसंत मोरे यांची दोस्ती बघितली, पण आता दुश्‍मनीही बघावी लागेल,” वसंत मोरे यांनी असा दम भरला आहे.

महापालिका हद्दीबाहेर मांगडेवाडी, भिलारेवाडी, निंबाळकरवाडी आणि कात्रज तलावात येणारे मैलापाणी रोखण्यासाठी दहा कोटी रुपयांच्या सांडपाणी वाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव मनिषा कदम यांनी मांडला होता. हा प्रस्ताव पालिकेच्या हद्दीबाहेरील मंजूरी होण्यावर प्रश्न चिन्ह उभी राहिली होती. या प्रस्तावर चर्चा दरम्यान मोरे आणि मनिषा कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु होते.

दीड महिन्यांपूर्वी प्रस्ताव सभेत आला तेव्हा कात्रज तलावाच्या कामाकडे दुर्लक्ष करीत हद्दीबाहेरील गावांना एवढा निधी देण्यास मोरे यांनी विरोध केला. त्यामुळे या प्रस्तावावर मतदान झाले. त्यावेळी मोरेंनी विरोधात तर,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

पालिका सभागृहात पुन्हा हा प्रस्ताव लोकांच्या मागणीनुसार मांडण्यात आला. मात्र, ‘काही मंडळी राजकीय द्वेषापोटी कामात खोडा घालत आहेत. कामे अडविण्याचा जाणीपूर्वक प्रयत्न ते करीत आहेत. ते योग्य नाही,’ अशा शब्दांत नगरसेविका मनिषा कदम यांनी मोरेंवर हल्ला केला.

Related posts

शिवसेनेचे हिंदुत्व हे भेंडीबाजारातले; सामनाच्या अग्रलेखावरून नितेश राणेंची टीका

Aprna

भाजप कार्यकारणीची उद्या मुंबईत बैठक होणार

News Desk

“अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणारच” किरीट सोमय्यांचा दावा!

News Desk