HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, म्हणाले एकाग्रतेकडे लक्ष द्या

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे ‘परीक्षा पर चर्चा’ कार्यक्रमाला त्यांनी संबोधित केले. देशात दरवर्षी परीक्षेच्या ताण-तणावामुळे अनेक विद्यार्थी जीवनयात्रा संपवतात त्य़ावर मोदींनी काही दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी आजच्या संवादातून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीचा संदेश दिला. देशात 100 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. मला खेद आहे की मी त्यांच्या भाषेत बोलू शकत नाही. त्यांच्यासाठी हे भाषण त्यांच्या स्थानिक भाषेत देण्याची विनंती मोदींनी केली. कनिष्का वत्स या विद्यार्थीनीने प्रश्न केला की, जर अभ्यासातून लक्ष विचलित होत असेल तर अभ्यासवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी, एकाग्रतेसाठी काय करावे. या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले, ‘ज्या गोष्टी तुमच्या मनाला स्पर्ष करतात त्या तुमच्या कायम स्मरणात राहातात. म्हणजेच मेमरी प्रॉब्लेम नाही. तर तुमच्या मनाला काय स्पर्ष करते हे महत्त्वाचे आहे.’ ‘पाण्याची चव फार कमी लोकांना माहित असेल. जे मनापासून पाणी पितात त्यांना पाण्याची चव कळते. त्याला म्हणतात एकाग्रता.’

पालकांची मुलांकडून मोठी अपेक्षा असते, ते विसरुन जातात की प्रत्येकाच्या वेगळ्या क्षमता असतात. तुम्ही आमच्या पालकांना याबद्दल सांगू शकता. हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांनी विचारला. लेहमधील महाविद्यालयीन विद्यार्थीनीनेही हाच प्रश्न विचारला.

स्वतःला ओळखले पाहिजे. तुमच्यात काय आहे हे पहिले जाणून घ्या. यासाठी तुमच्या मित्रांची मदत घ्या. प्रतिस्पर्धा कराल तर एक प्रकारचा तणाव येतो. त्यासाठी कोणाशी स्पर्धा करु नका. तर स्वतःशी स्पर्धा करा. लोक तुमच्यासोबत स्पर्धा करतील अशी स्थिती निर्माण करा. आज तुम्ही 2 तास अभ्यास करत असाल तर 3 तास वेळ द्या. असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माहीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी !

News Desk

लग्नासाठी पैसे दिले नाही म्हणून वडीलांचा खून

News Desk

Ayodhya Verdict : त्रिसदस्यीय समितीत तटस्थ व्यक्तीची नेमणूक करणे योग्य ठरले असते !

News Desk