HW News Marathi
देश / विदेश

गोरखपूरमध्ये ४८ तासांत आणखी ३० बालकांचा मृत्यू

गोरखपूर : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ऑक्सिजन टँकअभावी ७० हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा ४८ तासांमध्ये ३० बालकांना जीव गमवावा लागला आहे. येथील बाबा राघवदास रुग्णालयात घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघात येणाऱ्या बाबा राघव दास रुग्णालय काही दिवसांपूर्वी ७० हून अधिक बालकांना जीव गमवावा लागला होता. या रुग्णालयात गेल्या ४८ तासांमध्ये ३० बालकांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तर गेल्या ७२ तासांत रुग्णालयातील तब्बल ६१ बालकांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्तान टाईम्सने ही आकडेवारी दिली आहे.

मेंदूचे विकार, न्युमोनिया, जंतू संसर्ग आणि नवजातांना भेडसावणाऱ्या विविध जीवघेण्या समस्यांनी या ३० तीन बालकांचा जीव घेतला आहे. रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णालयातील यंत्रणा कमी पडू लागली आहे. त्यामुळे सर्व बालकांवर उपचार करणे रुग्णालय प्रशासनाला शक्य झालेले नाही. २७, २८ आणि २९ ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये मेंदू विकारावरील उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या वॉर्डातील ११ बालकांनी प्राण गमावले. याच काळात एनएनआयसीयू आणि जनरल वॉर्डमधील प्रत्येकी २५ मुले दगावली आहेत.

उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने रोगांचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रोगराई पसरुन मृतांचा आकडा वाढेल,अशी भीती व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘रेप इन इंडिया’ व्यक्तव्यावर माफी मागणार नाही, राहुल गांधींची ठाम भूमिका

News Desk

निवडणुकांच्या तोंडावर कन्नडींगांचे भाषाप्रेम जागे

News Desk

मास्क, हॅन्ड सॅनिटायझरवर जीएसटी कर कोरोनाच्या काळात आकारु नका

News Desk
मुंबई

निकाल लागला पण विद्यार्थ्यांनी नाही पाहिला

News Desk

मुंबई : धडपडत, चाचपडत रविवारी रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाने एकदाचा टीवाय बीकॉमचा निकाल जाहीरकेला खरा, पण अद्यापही तो विद्यार्थ्यांना काही पाहाता आलेला नाही. संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणींचे कारण यासाठी देण्यात येत असले, तरीही त्याने त्रस्त विद्यार्थ्यांचे काही समाधान झालेले नाही. त्यामुळे सोमवारी अनेकविद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे धाव घेतली होती. मुंबई विद्यापीठाने मार्च-एप्रिलदरम्यान, पदवी अभ्यासक्रमाच्या घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाइन सुरू आहे. ऑगस्ट महिना उजाडूनही ४० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेलेनाहीत. काही निकाल तांत्रिक अडचणींमुळे राखीव ठेवले आहेत. मात्र येत्या १० दिवसांत विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे.

Related posts

बेस्ट कर्मचाऱ्यांचा लढा यशस्वी, कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार किमान ७००० रुपयांची वाढ

News Desk

मुंबईच्या नेपीएन्सी रोडवरील इमारतीला लागली आग, कोणतीही जीवितहानी नाही

News Desk

नेवाळीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं

News Desk