HW News Marathi
देश / विदेश

मुंबई काँग्रेसमधील वाद दिल्लीपर्यंत ?

नवी दिल्ली | मिलिंद देवरा यांनी आपल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा सोपविल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी मिलिंद देवरा यांच्यावर टीका केली. याप्रकरणी काँग्रेस नेते भाई जगताप यांनी संजय निरुपम यांचा समाचार घेतला. या प्रकरणादरम्यान मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता दिल्लीपर्यंत पोहोचले असून संजय निरूपम यांना दिल्लीला बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

निरुपम यांची मिलिंद देवरांवर टीका

मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट करून मिलिंद देवरा यांच्यावर टीका केली. “कोणत्याही पदाचा राजीनामा देणे ही केवळ त्यागाची भावना असते. मात्र, इथे तर राष्ट्रीय पदाची मागणी केली जाते. हा राजीनामा आहे की उच्च पद मिळावे यासाठी केलेला प्रयत्न ?”, असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रामणे “अशा स्वार्थी आणि कर्मठ लोकांपासून सावध राहायला हवे”, असे देखील निरुपम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

भाई जगताप यांनी घेतला निरुपम यांचा समाचार

भाई जगताप यांनी या ट्विटच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांचा समाचार घेतला. “काही नेते आपण काँग्रेसी असल्याचा फक्त दावा करतात. मात्र, प्रत्यक्षात ते जातीयवाद आणि भाषावादाचे राजकारण करतात”, असे म्हणत भाई जगताप यांनी संजय निरुपम यांना घरचा आहेर दिला आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यांमुळे मुंबई काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोरोनाच्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी केंद्राची ४ डिसेंबरला बैठक होणार

News Desk

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का- सिद्धूंचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा….

News Desk

OBC आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

News Desk