HW News Marathi
देश / विदेश

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्या घटनापीठाची स्थापना

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणाच्या सुनावणी करण्यासाठी घटनापीठाची आज (२५ जानेवारी) पुर्नरचना करण्यात आली आहे. नव्याने स्थापन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. घटनापीठामध्ये न्यायमूर्ती अशोक भुषण, आणि न्यायमूर्ती अब्दुल नाझीर यांचा समावेश केला आहे.

यापूर्वी न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी पाच सदस्यीय घटनापीठातून माघार घेतल्याने अयोध्या वादावर पुढील सुनावणी २९ जानेवारीला होणार आहे. त्या सुनावणीमध्ये नियमित सुनावणीसाठी तारीख निश्चित केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती अशोक भुषण, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, आणि न्यायमूर्ती अब्दुल नाझीर यांचा समावेश केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सायकलवर फिरून कर्नाटकात…”, येडियुरप्पा राजीनामा देताना झाले भावुक

News Desk

‘यास’ चक्रीवादळ तौक्तेपेक्षाही भयंकर, महाराष्ट्राला काय धोका?

News Desk

अमृतसर रेल्वे अपघातासाठी नागरिकच जबाबदार, सीसीआरएसचा अहवाल

News Desk