HW News Marathi
देश / विदेश

नाणार प्रकल्प महाराष्ट्रातून जाऊ नये पण… शरद पवार

मुंबई | ‘नाणार प्रकल्प महाराष्ट्रातून जावा असे वाटत नाही,’ असे मत राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. नाणार प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिल्यामुळे सध्या महाराष्ट्रात या प्रकल्पावरुन राजकारण तापले आहे. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष एकमेकांवर तोडसुख घेत आहेत.

या प्रकल्पाच्या राजकारणात आता शरद पवार यांनी उडी घेतली आहे. केंद्र सरकारचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प महाराष्ट्रातून जावा असे वाटत नाही. पण स्थानिकांचा विरोध होत असेल तर या प्रकल्पासाठी पर्यायी जागेचा विचार होऊ शकतो, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

‘स्थानिकांचा विरोध डावलून नाणारचा रिफायनरी प्रकल्प शिवसेना कदापि होऊ देणार नाही’, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी परदेशी कंपन्यांसोबत सामंज्य करारावर दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सौदी अरेबियाची अरामको ही बडी कंपनी या प्रकल्पासाठी ५० टक्के गुंतवणूक करणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू- काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला

News Desk

Dongri Building Collapsed : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या सहवेदना

News Desk

बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ४० जणांची स्टार प्रचारक यादी केंद्रीय कार्यालयातून जाहीर… 

News Desk