HW News Marathi
देश / विदेश

भारत-चीन संघर्षात शहीद झालेल्या ‘त्या’ २० जवानांची नावे जाहीर

नवी दिल्ली | देशासमोर एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे उभे ठाकलेले तितकेच मोठे आव्हान आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत-चीन सीमासंघर्ष चिघळायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराने मंगळवारी (१६ जून) रात्री दिलेल्या माहितीनुसार, गलवान खोऱ्यात 15 जून रोजी रात्री भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. लोखंडाच्या सळ्या, दगड-काठ्यांच्या साहाय्याने भारत-चीन दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये मोठी हिंसा झाली. यात भारताचे तब्बल २० जवान शहीद झाले. दरम्यान, आता अखेर भारताच्या या २० जवानांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

भारत-चीन संघर्षात भारताचे ‘हे’ २० जवान शहीद

  • कर्नल संतोष बाबू (हैदराबाद)
  • नंदुराम सोरेन (मयुरभंज)
  • मनदीप सिंग (पटियाला)
  • सतनाम सिंग (गुरुदासपूर)
  • हवालदार के पालानी (मदुराई)
  • हवालदार सुनील कुमार (पटना)
  • हवालदार बिपुल रॉय(मेरठ शहर)
  • दिपक कुमार (रेवा)
  • राजेश ओरंग (बिरघम)
  • कुंदनकुमार ओझा (साहीबगंज)
  • गणेश राम (कांकेर)
  • चंद्रकांता प्रधान (कंधलमाल)
  • अंकुश (हमीरपूर)
  • गुरुबिंदर (संगरुर)
  • गुरुतेज सिंग (मानसा)
  • चंदन कुमार (भोजपूर)
  • कुंदन कुमार (साहरसा)
  • अमन कुमार (समस्तीपूर)
  • जय किशोर सिंग(वैशाली)
  • गणेश हंसदा (पूर्व सिंगभूम)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून बंदची हाक, सरकारी बसेसची तोडफोड

swarit

३७० कलम रद्द केल्यास जम्मू-काश्मीरचे भारतासोबतचे संबंध संपतील !

News Desk

चाळीस महिने सत्तेत असून जुन्या सरकारवर टीका कशासाठी 

News Desk