HW News Marathi
देश / विदेश

ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदी उपस्थित केला दहशतवादाचा मुद्दा

बीजिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स परिषदेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर ब्रिक्स देशांच्या घोषणापत्राच्या ४८ व्या परिच्छेदात दहशतवादाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.‘आम्ही या भागात पसरत असलेल्या दहशतवादाबद्दल चिंता व्यक्त करतो,’ असे घोषणापत्रात नमूद करण्यात आले आहे. ब्रिक्सच्या घोषणापत्रातून लष्कर ए तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचा कठोर शब्दांमध्ये निषेध करण्यात आला आहे.

वाचा -अखिलेश यादवकडून शहीद पत्नीऐवजी भलतीचाच सत्कार

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी भारताकडून वारंवार करण्यात आली आहे. मात्र भारताच्या प्रयत्नांना चीनकडून अनेकदा खीळ घालण्यात आली. मात्र ब्रिक्सच्या घोषणापत्रात दहशतवादी संघटना आणि त्यांच्या कारवायांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आल्याने भारताला मोठे यश मिळाले आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करुन त्याच्यावर संयुक्त राष्ट्राकडून प्रतिबंध आणले जावेत,यासाठी भारताने अनेकदा प्रयत्न केले आहेत. मात्र अद्याप तरी भारताला यात पूर्णपणे यश आलेले नाही.

https://twitter.com/Mahabatmi1

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता पाकिस्तानसोबत पुढचा संवाद पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर !

News Desk

कुलभूषण जाधवांना सोडवा, हाच सरकारचा खरा पुरुषार्थ ठरेल!

News Desk

अंडरवर्ल्ड अबू सालेमला 22 ऑगस्टला शिक्षा

News Desk