HW News Marathi
देश / विदेश

अबब… चार वर्षात मोदींचे ऐवढे परदेश दौरे

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजपासून पाच दिवसीय आफ्रिकेचा दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात मोदी रवांडा, युगांडा आणि द. आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी सोमवारी सकाळी रवाना झाले आहेत. परदेशी दौऱ्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मोदी हे रवांडा आणि युगांडा या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. मोदी चार वर्षात जवळपास पुर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत त्यांनी परदेशी दौरे केले आहेत.

मोदींनी गेल्या चार वर्षात ५४ देशांचे दौरे केले आहेत. आता यात रवांडा आणि युगांडा या दोन देशांचा समवेश होऊन ५६ असे परदेशी दौऱ्यांची संख्या झाली आहे. तर मोदींनी चार वर्षात १७१ दिवस विदेशात घालवले आहेत. मोदींच्या या परदेशी दौऱ्यांवर १४८४ कोटी रुपयांचा खर्च झाला. मोदींच्या २०१५च्या एप्रिल महिन्यातील फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा यादेशांतील दौऱ्यात सर्वात जास्त खर्च झाला सांगितले आहे.

मोदींना त्यांच्या ४ वर्षाच्या कार्यकाळात अमेरिकेला सर्वाधिक वेळा भेट दिली आहे. तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या ९ वर्षाच्या कार्यकर्दीत परदेशी दौऱ्यावर ६४२ कोटी रुपये खर्च झाले होते. मनमोहन सिंग यांच्या कार्यकालाच्या विदेश दौऱ्यांचा खर्चा निम्मापेक्षाही कमी आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला १ रुपयांचे पहिले दान

swarit

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

News Desk

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन दक्षिण कोरियात दाखल

News Desk
मुंबई

विरोधक एकत्र आले तरही भाजपचा विजय निश्चित | अमित शहा

swarit

मुंबई | आगामी निवडणुकीत भाजपच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र आले, तरी भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा रविवारी २२ जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर होते.

या दौऱ्यात शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली असून पुन्हा एकदा भाजपची सत्ता यावी, यासाठी आतापासूनच कंबर कसून कामाला लागले पाहिजे. आणि निवडणुकीत कोण सोबत येणार की नाही यांचा विचार करू नका. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आले पाहिजे, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे शहा यांनी बैठीकीत कार्यकर्त्यांना सांगितले.

अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीची पुर्व तयारी म्हणून महत्त्वपुर्ण बैठक मुंबई येथील वसंत स्मृती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपचे आदी नेते मंडळी यात हजेरी लावली होती.

Related posts

राज्यसभेसाठी भाजपचे तीन उमेदवार निश्चित

News Desk

शिवसेनेनं सरकारमधून बाहेर पडून शिवसंपर्क मोहीम राबवावी – अशोक चव्हाण

News Desk

दोन सुरक्षारक्षकांनी केला पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

News Desk