HW News Marathi
मुंबई

विरोधक एकत्र आले तरही भाजपचा विजय निश्चित | अमित शहा

मुंबई | आगामी निवडणुकीत भाजपच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र आले, तरी भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा रविवारी २२ जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर होते.

या दौऱ्यात शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली असून पुन्हा एकदा भाजपची सत्ता यावी, यासाठी आतापासूनच कंबर कसून कामाला लागले पाहिजे. आणि निवडणुकीत कोण सोबत येणार की नाही यांचा विचार करू नका. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आले पाहिजे, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे शहा यांनी बैठीकीत कार्यकर्त्यांना सांगितले.

अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीची पुर्व तयारी म्हणून महत्त्वपुर्ण बैठक मुंबई येथील वसंत स्मृती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपचे आदी नेते मंडळी यात हजेरी लावली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शरद पवारांविषयी केलेलं ते वक्तव्य संजय राऊतांना भोवलं,राऊत शिवसेनेत आहेत का राष्ट्रवादीमध्ये ?कॉंग्रेसचा सवाल

News Desk

शेटे परिवारांची अनोखी घटस्थापना

News Desk

ओएनजीसीचे हेलिकॉप्टर कोसळले

News Desk
देश / विदेश

मोदी सरकारविरोधात आज अविश्वास प्रस्ताव

News Desk

नवी दिल्ली | आंध्र प्रदेशचे आंध्र आणि तेलंगणा असे विभाजन झाल्यावर आंध्रला खास दर्जा देण्याचे काँग्रेसने मान्य केले होते. पण चौदाव्या वित्त आयोगाचा अहवाल संसदेत सादर होऊन संसदेने मंजूर केल्यावर आंध्रला खास दर्जा देणे मोदी सरकारला शक्य नव्हते.

त्यामुळं नाराज होऊन तेलगू देसमचे नेत्यांनी मंत्रीपदाचे राजीनामे दिले. सरकार या धक्यातून सावरत नाही तोपर्यंत दोन दिवसांपूर्वी लोकसभेच्या दोन जागावरही भाजपाचा पराभव झाला. याच संधीचा फायदा घेत वायएसआर काँग्रेस पक्षाकडून मोदी सरकारविरोधात अविस्वास प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या अविश्वास प्रस्तावाला तेलगू देसम पक्षाचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे.

Related posts

संभाजीराजे आणि शरद पवारांमध्ये १५ मिनिटे चर्चा ! भेटीत नेमके काय घडले ?

News Desk

कर्नाटकात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी येडियुरप्पा राज्यपालाच्या भेटीला

News Desk

कर्नाटकात राजकीय भूकंप : आमदारांच्या राजीनाम्याने काँग्रेस-जेडीएसचे सरकार धोक्यात ?

News Desk