HW News Marathi
Covid-19

‘या’ ३ कारणांमुळे देशात कोरोना रूग्ण वाढले, मोदींनी सांगितले कारण

नवी दिल्ली | कोरोना साथीच्या काळात पाळायच्या नियमांचा भंग, सुरक्षात्मक उपायांचा अभाव व वर्षभराच्या साथीमुळे आलेला ताणतणाव या तीन कारणांमुळे अलीकडच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत सांगण्यात आले आहे

६ ते १४ एप्रिलदरम्यान मुखपट्टीचा वापर व इतर प्रतिबंधात्मक उपायांबाबत सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले असून महाराष्ट्र, पंजाब व छत्तीसगड या कोविड रुग्णांची जास्त संख्या असलेल्या राज्यांत केंद्राची पथके पाठवण्यात येणार आहेत, त्यात वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असणार आहे.

आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येणार असून व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची उपलब्धता, वेगाने चाचण्या व लसीकरण, खाटांची संख्या वाढवणे या उपायांचाही अवलंब करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सामूहिक जबाबदारीचे पालन करोनाचा सामना करण्यासाठी गरजेचे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. चाचण्या, संपर्क शोध, उपचार, कोविड प्रतिबंधक वर्तन, लसीकरण या पाच कलमी उपायांचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

देशात कोरोनाची साथ वेगाने वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यात लसीकरण, वाढता संसर्ग या मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, आरोग्य सचिव हे बैठकीस उपस्थित होते.

गेल्या २४ तासांत देशात ९३२४९ इतके रुग्ण सापडले असून एकूण संख्या १.२४ कोटी झाली आहे. १९ सप्टेंबरनंतर ही सर्वात मोठी संख्या असून सप्टेंबरमध्ये ९३३३७ इतकी रुग्णसंख्या होती. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे,की आठ राज्यातील प्रमाण एकूण संख्येच्या ८१.४२ टक्के आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब व मध्य प्रदेशात जास्त रुग्णवाढ झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१०८ वर्षांच्या आजींचा जयंत पाटलांकडून साडीचोळी देऊन सत्कार ! ‘हे’ आहे कारण

News Desk

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे; नववर्षापासून नवीन संकल्प करुयात ! – मुख्यमंत्री

Aprna

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ३३ हजार ५३३ नव्या कोरोनाची नोंद

Aprna