HW News Marathi
देश / विदेश

भंडाऱ्यातील बालकांच्या मृत्यूने पंतप्रधान देखील हळहळले!

भंडारा | आजची (९ जानेवारी) पहाट महाराष्ट्रासाठी मनाला धक्का लावणारी होती. भंडारा जिल्ह्यात नवजात बालकांच्या अतिदक्षता युनिटमध्ये आग लागली आणि या आगीत १० बालकांचा मृत्यू झाला तर ७ बालकांना वाचवण्यात यश आले. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली.

मन हेलावून टाकणारी घटना – नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. तसेच जे बालक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी भावना मी व्यक्त करतो, असे नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी आहे. ज्या कुटुंबांतील मुलांचा या घटनेत मृत्यू झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना, असे ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

घटना अत्यंत वेदनादायी – राहूल गांधी

राहुल गांधी भंडाऱ्यातील या घटनेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामधील घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वन करतो. मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो की, या घटनेतील मृत आणि जखमी बालकांच्या कुटुंबीयाना हरतऱ्हेची मदत करावी, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार महिला सुद्धा कास्टिंग काऊचपासून अपवाद राहिल्या नाही

Adil

“मोदींच्या वाराणसीतील सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क उतरवण्यात आले, कलियुग म्हणतात ते हेच का?”

News Desk

आसाममध्ये उल्फाच्या दहशतवाद्यांकडून ५ तरुणांची अमानुषपणे हत्या

Gauri Tilekar