HW News Marathi
Covid-19

मोदींनी पहिल्याच केंद्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला कोरोनाचा मुद्दा!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवीन मंत्रिमंडळाची पहिली बैठक काल (८ जुलै) पार पडली. या बैठकीत अनेक मुद्दे मांडले गेले पण त्यापैकी एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे कोरोना रुग्णाचा. करोनाविरुद्धच्या लढ्यात कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा सहन केला जाणार नाही असं पंतप्रधान मोदींनी गुरुवारी घेतलेल्या नव्या मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये स्पष्ट केलं आहे. मागील काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी लोक मास्क न वापरता, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करता गर्दी करत असल्याचे व्हिडीओ आणि फोटो समोर येत असल्याचा दाखला देत मोदींनी हा इशारा दिला. मास्क न घालता फिरणे याबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात भीती असलायला हवी, असं म्हणताच मोदींनी अप्रत्यक्षपणे मास्क न घालता लोकांनी घराबाहेर पडू नये असं म्हटलं आहे.

कोरोनाच्या परिस्थितीमध्ये निष्काळजीपणा परवडणार नाही

संपूर्ण देश कोरोना महामारीशी लढत आहे. दीड वर्ष आपण सगळेच ह्याला सामोरं जात असताना अद्यापही हा रोज नष्ट झालेला नाही. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मागील काही दिवसांपासून आपण असे अनेक व्हिडीओ आणि फोटो पाहत आहोत जिथे लोक मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंग न ठेवता फिरताना दिसत आहेत. हे चांगलं दृष्य नाही. या अशा वागण्यामुळे आपल्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे,”. पंतप्रधान मोदींनी देशाने करोनाविरुद्ध दिलेला लढा हा पूर्ण ताकदीने दिल्याचं सांगतानाच याचं श्रेय पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांना दिलं. सध्या देशात मोठ्याप्रमाणात लसीकरण सुरु असून चाचण्यांची संख्याही समाधानकारक असल्याचंही मोदींनी अधोरेखित केलं. सध्याच्या परिस्थितीमध्ये बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा आपल्याला परवडणार नाही. एक साधी चूक झाली तरी त्याचा मोठा परिणाम करोनाविरुद्धच्या आपल्या लढ्यावर होऊ शकतो”, असं मोदी म्हणाले.

कोरोना रुग्णांची संख्या काही महिन्यांच्या तुलनेत कमी

मागील काही महिन्यांच्या तुलनेत आता करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने लोकांना भटकण्याची इच्छा होत असणार. पण करोना अद्याप संपलेला नाही आणि तो पूर्णपणे नष्ट होण्यासाठी बराच काळ आहे. काही देशांमध्ये रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढलीय आणि हा विषाणूही सतत आपले स्वरुप बदलत असल्याने सावध राहण्याची गरज असल्याचं मोदींनी सांगितलं. “मंत्री म्हणून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याऐवजी आपण त्यांना करोनासंदर्भातील सर्व खबरदीचे उपाय आणि नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे. यामुळे आपल्याला भविष्यात या साथीवर मात करता येईल,” अलं मोदी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुशखबर! देशात ऑगस्टपासून मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ

News Desk

कोविडसंदर्भात आतापर्यंत राज्यात १ लाख १४ हजार गुन्हे दाखल

News Desk

कोरोना लसीकारणासाठी लागणारा खर्च केंद्राने करावा-राजेश टोपे

News Desk