HW News Marathi
देश / विदेश

नक्षलवाद्यांनी घडवून आणला भूसुरुंगाचा स्फोट, ६ जवान शहीद तर १० जखमी

रांची | झारखंडच्या गढवा जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी रात्री भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला होता. या भूसुरुगांच्या स्फोटात ६ जवान शहीद झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी पोलिसांना गढवामधल्या छिंजो या परिसरात नक्षलवाद्यांचे वास्तव्य असल्याचे समजले होते. त्यानंतर अन्य सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने इथे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले होते.

याबाबत प्राप्त झालेल्या ,चारही बाजूंनी घेरल्यानंतर नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दरम्यान नक्षलवाद्यांनी रस्त्यात लावलेल्या भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. त्यात ६ जवान शहीद झाले आहेत. गढवातले पोलीस उपमहानिरीक्षक विपुल शुक्ला यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जवळपास १० जवान जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या हल्ल्यानंतर गढवा परिसराला छावणीचे स्वरूप आले असून, सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी ९ ऑगस्टला निवडणूक

swarit

अजून एक बँक घोटाळा, व्यापाऱ्याने ३९० कोटीचा चुना लावला

News Desk

कोरोनाच्या परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे भाजपची नाव न घेता तक्रार

News Desk